शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिवाजी पुलाचा प्रश्न आंदोलक, पत्रकारांमुळे मार्गी : चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:28 IST

शिवाजी पुलाचा प्रश्न हा आंदोलक आणि पत्रकार यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याची स्पष्ट कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशिवाजी पुलाचा प्रश्न आंदोलक, पत्रकारांमुळे मार्गी : चंद्रकांत पाटील प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन

कोल्हापूर : शिवाजी पुलाचा प्रश्न हा आंदोलक आणि पत्रकार यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याची स्पष्ट कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बोंद्रे, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर महेश सावंत यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजाला दिशा देण्यासाठी पत्रकार हा अभ्यासू हवा असे सांगून ग्रंथालयासाठी उत्तम पुस्तके घ्यावीत. मुंबई, दिल्ली येथील पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी एका पत्रकाराला फेलोशीप देण्याचीही घोषणा यावेळी पाटील यांनी केली.पत्रकारांच्या अडचणींचा उहापोह करताना पाटील म्हणाले, आपण एक ५00 घरांची नवी योजना तयार करत असून यामध्ये पत्रकारांना किफायतशीर किंमतीमध्ये घर उपलब्ध करू दिले जाईल. अटल पेन्शनच्या माध्यमातून सेवानिवृत्तीवेतन देण्यासाठी प्रयत्न करू.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले,निधीअभावी कुणावरही उपचार झाले नाहीत अशी परिस्थिती आता राहिली नाही. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नाही इतका निधी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप सरकारचा मला अभिमान आहे. आम्हांला घडवण्यामध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे.उपचारासाठी मदत केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मदत केल्याबद्दल छायाचित्रकार संदीप मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच हे दालन उभारणीसाठी सहकार्य करणारे क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव, संदीप मिरजकर, निखिल अगरवाल, सचिन अगरवाल, अजित खोत यांचा सत्कार करण्यात आला.प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. शुभांगी तावरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सुनील पाटील, वसंतराव मुळीक, ‘आस्मा’चे अध्यक्ष राजीव परूळेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर