शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

By admin | Updated: January 31, 2017 23:44 IST

युती महापालिकेपुरती तुटली; सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करणार

सावंतवाडी : शिवसेना-भाजप युती महानगरपालिकेपुरती तुटली आहे. शिवसेनेचा सत्तेत जीव अडकल्याने ते सरकारमधून बाहेर पडू शकणार नाहीत आणि पडलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था भाजपने करून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, तशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले.काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी सावंतवाडी तालुक्यात येऊन आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, माजी सभापती प्रियांका गावडे, आनंदी परब, प्रमोद गावडे, नगरसेवक राजू बेग, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, शिवसेना आणि भाजपने यापूर्वीही अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढल्या आहेत आणि त्यानंतर ते एकत्र आले आहेत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचेही उदाहरण सर्वांसमोर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना युती नकोच होती, फक्त केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी सर्व नाटके केली.जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. याबाबत माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अद्याप भेटले नाहीत. त्यामुळे अजून चर्चा झाली नाही. काँग्रेसकडे विद्यमान ४२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत बोलणी करीत असताना सर्व बाजू विचारात घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल.जी विकासकामे केली, निधी आणला म्हणून सांगतात, त्यांनी निधी कसा आणला, कोणत्या योजनेवर खर्च केला याचा तपशील द्यावा. याबाबतची मागणी मी स्वत: जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून, याचे उत्तर अद्याप मिळाले नाही आणि अलीकडे जी उद्घाटने झाली, ती काँग्रेसच्या काळातील निधीतून करण्यात आली, अशी टीकाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली आहे. (प्रतिनिधी)निवडणुका आल्या की भाजपला ‘ईडी’ची आठवण येतेप्रत्येक वेळी निवडणुका आल्या की, नारायण राणे यांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. भाजपला मला अधिवेशन व निवडणुकांपासून रोखायचे असते, पण मी गप्प बसणारा नाही. माझे काम करीतच राहणार आहे. राज्यात सर्वत्र प्रचारासाठी जाणार असल्याचे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांत उमेदवारांची यादी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ उमेदवार इच्छुक आहेत. ही वस्तुस्थिती आहे, पण यामुळे बंडखोरी होईल, असे वाटत नाही. बंडखोरी होईल या भीतीने आम्ही उमेदवार घोषित केले नाहीत, ही अफवा चुकीची आहे. काँग्रेस दोन दिवसांत उमेदवारांची यादी घोषित करणार आहे. मी प्रचारदौऱ्यात असल्याने यादी जाहीर करण्यास उशीर झाल्याचे राणे यांनी सांगितले.महाआघाडी होऊनही जिल्हा परिषद जिंकली शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा काँग्रेसला घेण्याची गरज नाही. कारण मागच्या निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात सर्व पक्षांची महाआघाडी होती. तरीही जनता काँग्रेसच्याच मागे राहते. त्यामुळे यावेळी युती तुटली तरी काही फरक पडणार नाही. सत्ता आमचीच येणार, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.