शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

By admin | Updated: January 31, 2017 23:44 IST

युती महापालिकेपुरती तुटली; सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करणार

सावंतवाडी : शिवसेना-भाजप युती महानगरपालिकेपुरती तुटली आहे. शिवसेनेचा सत्तेत जीव अडकल्याने ते सरकारमधून बाहेर पडू शकणार नाहीत आणि पडलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था भाजपने करून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, तशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले.काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी सावंतवाडी तालुक्यात येऊन आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, माजी सभापती प्रियांका गावडे, आनंदी परब, प्रमोद गावडे, नगरसेवक राजू बेग, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, शिवसेना आणि भाजपने यापूर्वीही अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढल्या आहेत आणि त्यानंतर ते एकत्र आले आहेत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचेही उदाहरण सर्वांसमोर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना युती नकोच होती, फक्त केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी सर्व नाटके केली.जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. याबाबत माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अद्याप भेटले नाहीत. त्यामुळे अजून चर्चा झाली नाही. काँग्रेसकडे विद्यमान ४२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत बोलणी करीत असताना सर्व बाजू विचारात घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल.जी विकासकामे केली, निधी आणला म्हणून सांगतात, त्यांनी निधी कसा आणला, कोणत्या योजनेवर खर्च केला याचा तपशील द्यावा. याबाबतची मागणी मी स्वत: जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून, याचे उत्तर अद्याप मिळाले नाही आणि अलीकडे जी उद्घाटने झाली, ती काँग्रेसच्या काळातील निधीतून करण्यात आली, अशी टीकाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली आहे. (प्रतिनिधी)निवडणुका आल्या की भाजपला ‘ईडी’ची आठवण येतेप्रत्येक वेळी निवडणुका आल्या की, नारायण राणे यांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. भाजपला मला अधिवेशन व निवडणुकांपासून रोखायचे असते, पण मी गप्प बसणारा नाही. माझे काम करीतच राहणार आहे. राज्यात सर्वत्र प्रचारासाठी जाणार असल्याचे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांत उमेदवारांची यादी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ उमेदवार इच्छुक आहेत. ही वस्तुस्थिती आहे, पण यामुळे बंडखोरी होईल, असे वाटत नाही. बंडखोरी होईल या भीतीने आम्ही उमेदवार घोषित केले नाहीत, ही अफवा चुकीची आहे. काँग्रेस दोन दिवसांत उमेदवारांची यादी घोषित करणार आहे. मी प्रचारदौऱ्यात असल्याने यादी जाहीर करण्यास उशीर झाल्याचे राणे यांनी सांगितले.महाआघाडी होऊनही जिल्हा परिषद जिंकली शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा काँग्रेसला घेण्याची गरज नाही. कारण मागच्या निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात सर्व पक्षांची महाआघाडी होती. तरीही जनता काँग्रेसच्याच मागे राहते. त्यामुळे यावेळी युती तुटली तरी काही फरक पडणार नाही. सत्ता आमचीच येणार, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.