शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:32 IST

राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर१० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटींची भरपाई

कोल्हापूर : विमा कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची लूट सुरू केली होती. याविरोधात शिवसेनेने आक्रमकपणे जाब विचारल्याने कंपन्या नरमल्या आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.गेल्यावर्षी राज्यातील एक कोटी ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी संबंधित कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्यामध्ये विविध निकषांचा आधार घेत कंपन्यांनी ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविले; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षप्र्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये लक्ष घातले.

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे यांनी मुंबईत विराट मोर्चा काढत कंपन्यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोणत्या निकषावर राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले, याचा जाब उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना विचारला.

१५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून द्यावी, असा अल्टिमेटम शिवसेनेने दिल्याने कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि परताव्याच्या कामास गती आली. त्यातूनच १0 लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये भरपाई मिळाल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.शेतकऱ्यांचा पीक विमा निकषांच्या कात्रीत अडकू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विमा कंपन्या कशा पद्धतीने मनमानी करतात, हे सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.नुकसान ‘मंडल’ऐवजी गावावर ठरणार?विमा कंपन्या सरासरी नुकसान काढताना महसूल मंडल गृहीत धरून काढते. लहरी हवामानामुळे एका गावात अतिवृष्टी होते, पण त्याच्या शेजारील गावात कमी पाऊस होतो. परिणामी मंडलाचे सरासरी नुकसानावर परिणाम होतो; त्यामुळे येथून पुढे ‘मंडल’ऐवजी गाव पातळीवरील नुकसान गृहीत धरावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यानुसार सुधारणा होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरCrop Insuranceपीक विमा