शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:32 IST

राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर१० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटींची भरपाई

कोल्हापूर : विमा कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची लूट सुरू केली होती. याविरोधात शिवसेनेने आक्रमकपणे जाब विचारल्याने कंपन्या नरमल्या आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.गेल्यावर्षी राज्यातील एक कोटी ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी संबंधित कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्यामध्ये विविध निकषांचा आधार घेत कंपन्यांनी ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविले; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षप्र्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये लक्ष घातले.

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे यांनी मुंबईत विराट मोर्चा काढत कंपन्यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोणत्या निकषावर राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले, याचा जाब उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना विचारला.

१५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून द्यावी, असा अल्टिमेटम शिवसेनेने दिल्याने कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि परताव्याच्या कामास गती आली. त्यातूनच १0 लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये भरपाई मिळाल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.शेतकऱ्यांचा पीक विमा निकषांच्या कात्रीत अडकू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विमा कंपन्या कशा पद्धतीने मनमानी करतात, हे सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.नुकसान ‘मंडल’ऐवजी गावावर ठरणार?विमा कंपन्या सरासरी नुकसान काढताना महसूल मंडल गृहीत धरून काढते. लहरी हवामानामुळे एका गावात अतिवृष्टी होते, पण त्याच्या शेजारील गावात कमी पाऊस होतो. परिणामी मंडलाचे सरासरी नुकसानावर परिणाम होतो; त्यामुळे येथून पुढे ‘मंडल’ऐवजी गाव पातळीवरील नुकसान गृहीत धरावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यानुसार सुधारणा होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरCrop Insuranceपीक विमा