शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:32 IST

राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दणक्यानेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ : राजेश क्षीरसागर१० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटींची भरपाई

कोल्हापूर : विमा कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची लूट सुरू केली होती. याविरोधात शिवसेनेने आक्रमकपणे जाब विचारल्याने कंपन्या नरमल्या आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.गेल्यावर्षी राज्यातील एक कोटी ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी संबंधित कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्यामध्ये विविध निकषांचा आधार घेत कंपन्यांनी ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविले; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षप्र्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये लक्ष घातले.

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे यांनी मुंबईत विराट मोर्चा काढत कंपन्यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोणत्या निकषावर राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले, याचा जाब उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना विचारला.

१५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून द्यावी, असा अल्टिमेटम शिवसेनेने दिल्याने कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि परताव्याच्या कामास गती आली. त्यातूनच १0 लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये भरपाई मिळाल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.शेतकऱ्यांचा पीक विमा निकषांच्या कात्रीत अडकू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विमा कंपन्या कशा पद्धतीने मनमानी करतात, हे सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.नुकसान ‘मंडल’ऐवजी गावावर ठरणार?विमा कंपन्या सरासरी नुकसान काढताना महसूल मंडल गृहीत धरून काढते. लहरी हवामानामुळे एका गावात अतिवृष्टी होते, पण त्याच्या शेजारील गावात कमी पाऊस होतो. परिणामी मंडलाचे सरासरी नुकसानावर परिणाम होतो; त्यामुळे येथून पुढे ‘मंडल’ऐवजी गाव पातळीवरील नुकसान गृहीत धरावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यानुसार सुधारणा होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरCrop Insuranceपीक विमा