शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मंत्रालय पातळीवर शिवसैनिकांचे हेलपाटे वाचणार: सेनाभवनातून होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 11:24 IST

शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.

ठळक मुद्देमंत्रालय पातळीवर शिवसैनिकांचे हेलपाटे वाचणार: सेनाभवनातून होणार कार्यवाही स्थानिक कामे जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून येणार : मुख्यमंत्र्यांची संकल्पना

प्रवीण देसाईकोल्हापूर : शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.राज्यात सरकार आपले असले तरी कामे सहजरीत्या होत नाहीत. त्यासाठी मंत्रालयाबाहेर तिष्ठत बसावे लागते. असा अनुभव जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांना येत असतो. शिवसैनिकांनाही असे अनुभव येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची कामे सहजरीत्या होण्यासाठी ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करण्यात आला आहे.

यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकाशी संपर्क साधून त्यांना या संकल्पनेविषयी माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुखांकडून बैठका, मेळावे या माध्यमांतून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे.गावपातळीवरील विकासकामांसाठी निधी मागणी, राजकीय स्वरूपाचे गुन्हे मागे घेणे, तसेच स्थानिक स्तरावरील अन्य कामे शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांना कळवावीत. त्यानंतर ही कामे जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून सेनाभवन येथे जातील. त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ती थेट मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जाणार आहेत. आपल्या कामाचे काय झाले? तसेच ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती संबंधित शिवसैनिकाला मिळणार आहे. शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्र्यांनीही ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू बांधला आहे.

मंत्रालयातील जबाबदारी रवींद्र वायकर यांच्यावरमंत्रालयातील कामे निर्गतीकरणाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला आहे.

जिल्हाप्रमुखांना ग्रीन पासराज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या जिल्हाप्रमुखांनाही पासअभावी तिष्ठत राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्यांचा प्रवेश सुकर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच सर्व जिल्हाप्रमुखांना ‘ग्रीन पास’ दिले जाणार आहेत.

शिवसैनिकांची कामे पटदिशी व्हावीत, तसेच त्यांचा सन्मान राहावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.- संजय पवार,जिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर