शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मंत्रालय पातळीवर शिवसैनिकांचे हेलपाटे वाचणार: सेनाभवनातून होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 11:24 IST

शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.

ठळक मुद्देमंत्रालय पातळीवर शिवसैनिकांचे हेलपाटे वाचणार: सेनाभवनातून होणार कार्यवाही स्थानिक कामे जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून येणार : मुख्यमंत्र्यांची संकल्पना

प्रवीण देसाईकोल्हापूर : शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.राज्यात सरकार आपले असले तरी कामे सहजरीत्या होत नाहीत. त्यासाठी मंत्रालयाबाहेर तिष्ठत बसावे लागते. असा अनुभव जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांना येत असतो. शिवसैनिकांनाही असे अनुभव येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची कामे सहजरीत्या होण्यासाठी ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करण्यात आला आहे.

यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकाशी संपर्क साधून त्यांना या संकल्पनेविषयी माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुखांकडून बैठका, मेळावे या माध्यमांतून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे.गावपातळीवरील विकासकामांसाठी निधी मागणी, राजकीय स्वरूपाचे गुन्हे मागे घेणे, तसेच स्थानिक स्तरावरील अन्य कामे शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांना कळवावीत. त्यानंतर ही कामे जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून सेनाभवन येथे जातील. त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ती थेट मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जाणार आहेत. आपल्या कामाचे काय झाले? तसेच ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती संबंधित शिवसैनिकाला मिळणार आहे. शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्र्यांनीही ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू बांधला आहे.

मंत्रालयातील जबाबदारी रवींद्र वायकर यांच्यावरमंत्रालयातील कामे निर्गतीकरणाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला आहे.

जिल्हाप्रमुखांना ग्रीन पासराज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या जिल्हाप्रमुखांनाही पासअभावी तिष्ठत राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्यांचा प्रवेश सुकर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच सर्व जिल्हाप्रमुखांना ‘ग्रीन पास’ दिले जाणार आहेत.

शिवसैनिकांची कामे पटदिशी व्हावीत, तसेच त्यांचा सन्मान राहावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.- संजय पवार,जिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर