शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लोकसभेला उसना उमेदवार नको, कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या मेळाव्यात आग्रही मागणी

By समीर देशपांडे | Updated: July 8, 2023 16:24 IST

कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर  आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू ...

कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर  आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू शिवसेनेला सोडून गेले. त्यामुळ कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला उसना उमेदवार नको अशी आग्रही मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूरमधील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका करण्यात आली. संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनमध्ये हा मेळावा झाला. यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूरमधून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली. यावेळी मुरलीधर जाधव म्हणाले, आम्ही शिवसैनिक काही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. शिवसेना सोडल्यानंतर कोण बरोबर आहे की नाही याचा विचार न करता खासदार धैर्यशील माने आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चा काढला. १५ दिवसात माने शिवसेनेत आले आणि खासदार झाले. आता यापुढे हे चालणार नाही. विजय देवणे म्हणाले,  आम्ही संघटनेसाठी रक्ताचे पाणी करतो, पोटात अन्न नसताना शिवसैनिक रस्त्यावर उतरतो म्हणून संघटना जिवंत आहे. अशावेळी उमेदवारीला मात्र दुसऱ्याला प्राधान्य असे यावेळी तरी करू नका. यावेळी शहरप्रमुख रवि इंगवले, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांची भाषणे झाली. आपल्या सर्वांच्या भावना मला समजल्या आहेत. आपल्याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे तो देतील तो निर्णय स्वीकारून प्रत्येक जागा लढवण्यासाठीची तयारी करा असे आवाहन यावेळी दुधवडकर यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे