शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघात कोणी कोणाचा केला? हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, मंत्री मुश्रीफांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 12:17 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.आघाडीचे सरकार विश्वासघाताने आल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी, शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला की भाजपने शिवसेनेचा, हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन महिन्यातच कोरोनाची महामारी आली. तरीही ३४ लाख शेतकऱ्यांना २३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. विकासकामांना कात्री लावत विविध नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना २० हजार कोटींचे पॅकेज दिले. या महामारीमध्ये उध्दव ठाकरे यांनी संयमाने राज्याचा गाडा हाकला, त्यामुळेच देशातील सर्वेक्षणात त्यांना ३० टक्क्यांपेक्षा अधिक पसंती मिळाली. हेच भाजपच्या मंडळींचे दुखणं आहे.त्यामुळे सुशांतसिंह राजपूतपासून महापूर, एस. टी. कर्मचारी संपापर्यंत सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. या सगळ्या कुरापतींमध्येही दोन वर्षे आघाडी सरकारने उत्तम काम केले. बघता बघता उर्वरित कालावधीही पूर्ण करेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफShiv SenaशिवसेनाBJPभाजपा