शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

विश्वासघात कोणी कोणाचा केला? हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, मंत्री मुश्रीफांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 12:17 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.आघाडीचे सरकार विश्वासघाताने आल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी, शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला की भाजपने शिवसेनेचा, हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन महिन्यातच कोरोनाची महामारी आली. तरीही ३४ लाख शेतकऱ्यांना २३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. विकासकामांना कात्री लावत विविध नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना २० हजार कोटींचे पॅकेज दिले. या महामारीमध्ये उध्दव ठाकरे यांनी संयमाने राज्याचा गाडा हाकला, त्यामुळेच देशातील सर्वेक्षणात त्यांना ३० टक्क्यांपेक्षा अधिक पसंती मिळाली. हेच भाजपच्या मंडळींचे दुखणं आहे.त्यामुळे सुशांतसिंह राजपूतपासून महापूर, एस. टी. कर्मचारी संपापर्यंत सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. या सगळ्या कुरापतींमध्येही दोन वर्षे आघाडी सरकारने उत्तम काम केले. बघता बघता उर्वरित कालावधीही पूर्ण करेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफShiv SenaशिवसेनाBJPभाजपा