शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणे’वरुन शिरोळ तालुका तापला : इचलकरंजीच्या अमृत योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:16 IST

कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे.

ठळक मुद्देवारणा बचाव कृती समितीला शिरोळ तालुक्यातून बळ, पंचगंगा काठच्या गावांची वादामध्ये उडी

गणपती कोळी ।कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाला वारणाकाठाला बळ मिळाले असून या जनभावनेच्या रोषामागची भावना पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व शासनाने जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा जनक्षोभाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

इचलकरंजी शहराला सध्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णा नदीतील पाणी दूषित झाल्याने शहराने वारणा नदीतून अमृत योजनेतून थेट पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात वारणा नदीवर अवलंबून असलेल्या चांदोली धरणाची पाणी क्षमता, या नदीवर अवलंबून असलेली गावे, त्यातच इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा निर्णय घेतल्याने भविष्यातील पाण्याची समस्या ओळखून वारणा काठातील गावांनी या योजनेला विरोध केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या विरोधला न जुमानता पोलीस बंदोबस्तात योजनेच्या उदघाटनाचा कार्यक्रम दानोळी ग्रामस्थांनी उधळून लावला.

योजनेला विरोध केल्याने प्रशासनाने कायद्याचा आधार घेत विरोध करणाऱ्या प्रमुख लोकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यामुळे या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी संपूर्ण शिरोळ तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये पंचगंगा काठच्या गावांचा सहभाग होता.

वास्तविक या योजनेला विरोध करण्याचा पंचगंगा काठच्या गावांचा काहीच संबंध नाही. मात्र, शहराला शुध्द पाणी तेच प्यावे लागते. पालिका आणि शासनाच्या या पक्षपाती धोरणामुळे पंचगंगा काठच्या गावांनी या योजनेला विरोध करत वादात उडी घेतली आहे.

कोल्हापूरपासून इचलकरंजी शहरापर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगेत सोडल्याने पंचगंगा पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सांडपाण्यात इचलकरंजी शहराचा निम्मा वाटा आहे. पंचगंगा नदीवर शिरोळ तालुक्यातील बावीसहून अधिक गावे अवलंबून आहेत. मात्र, दूषित पाण्यामुळे तालुक्यातील शेतीबरोबर पशु व माणसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. कृष्णा नदी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने शुध्द पाण्यासाठी वारणा नदीचा आधार घेतला आहे.

मात्र, पंचगंगा व पर्यायाने कृष्णा नदी दूषित करण्याला इचलकरंजी शहरच प्रामुख्याने जबाबदार आहे. शुध्द पाण्याचा पर्याय शोधताना आपल्या दूषित पाण्याचा फटका इतर गावांना बसतो आहे, याची जाणीव पंचगंगा काठच्या गावांनी, आंदोलनकर्त्यांनी करून देऊनही या प्रश्नांचे गांभीर्य शहराला नसल्याने पंचगंगा काठही संतापला आहे. पालिकेने व शासनाने कायद्याचा आधार व पोलीस बळाचा वापर करून योजना सुरू केल्यास मोठा जनक्षोभ भडकण्याची शक्यता आहे. या जनक्षोभामागची भावना ओळखून निर्णय घेणे गरजेचे आहे.

शहरवासीयांना शुध्द पाणी मिळाले पाहिजे ही तालुक्याच्या जनतेची अपेक्षा आहे. मात्र, पालिका प्रशासन, शासन कर्तव्य पार पाडत नसल्याने वाद चिघळला आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनी भाग घेतल्याने वारणा काठाला बळ मिळाले आहे.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर