शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘वारणे’वरुन शिरोळ तालुका तापला : इचलकरंजीच्या अमृत योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:16 IST

कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे.

ठळक मुद्देवारणा बचाव कृती समितीला शिरोळ तालुक्यातून बळ, पंचगंगा काठच्या गावांची वादामध्ये उडी

गणपती कोळी ।कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाला वारणाकाठाला बळ मिळाले असून या जनभावनेच्या रोषामागची भावना पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व शासनाने जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा जनक्षोभाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

इचलकरंजी शहराला सध्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णा नदीतील पाणी दूषित झाल्याने शहराने वारणा नदीतून अमृत योजनेतून थेट पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात वारणा नदीवर अवलंबून असलेल्या चांदोली धरणाची पाणी क्षमता, या नदीवर अवलंबून असलेली गावे, त्यातच इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा निर्णय घेतल्याने भविष्यातील पाण्याची समस्या ओळखून वारणा काठातील गावांनी या योजनेला विरोध केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या विरोधला न जुमानता पोलीस बंदोबस्तात योजनेच्या उदघाटनाचा कार्यक्रम दानोळी ग्रामस्थांनी उधळून लावला.

योजनेला विरोध केल्याने प्रशासनाने कायद्याचा आधार घेत विरोध करणाऱ्या प्रमुख लोकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यामुळे या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी संपूर्ण शिरोळ तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये पंचगंगा काठच्या गावांचा सहभाग होता.

वास्तविक या योजनेला विरोध करण्याचा पंचगंगा काठच्या गावांचा काहीच संबंध नाही. मात्र, शहराला शुध्द पाणी तेच प्यावे लागते. पालिका आणि शासनाच्या या पक्षपाती धोरणामुळे पंचगंगा काठच्या गावांनी या योजनेला विरोध करत वादात उडी घेतली आहे.

कोल्हापूरपासून इचलकरंजी शहरापर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगेत सोडल्याने पंचगंगा पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सांडपाण्यात इचलकरंजी शहराचा निम्मा वाटा आहे. पंचगंगा नदीवर शिरोळ तालुक्यातील बावीसहून अधिक गावे अवलंबून आहेत. मात्र, दूषित पाण्यामुळे तालुक्यातील शेतीबरोबर पशु व माणसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. कृष्णा नदी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने शुध्द पाण्यासाठी वारणा नदीचा आधार घेतला आहे.

मात्र, पंचगंगा व पर्यायाने कृष्णा नदी दूषित करण्याला इचलकरंजी शहरच प्रामुख्याने जबाबदार आहे. शुध्द पाण्याचा पर्याय शोधताना आपल्या दूषित पाण्याचा फटका इतर गावांना बसतो आहे, याची जाणीव पंचगंगा काठच्या गावांनी, आंदोलनकर्त्यांनी करून देऊनही या प्रश्नांचे गांभीर्य शहराला नसल्याने पंचगंगा काठही संतापला आहे. पालिकेने व शासनाने कायद्याचा आधार व पोलीस बळाचा वापर करून योजना सुरू केल्यास मोठा जनक्षोभ भडकण्याची शक्यता आहे. या जनक्षोभामागची भावना ओळखून निर्णय घेणे गरजेचे आहे.

शहरवासीयांना शुध्द पाणी मिळाले पाहिजे ही तालुक्याच्या जनतेची अपेक्षा आहे. मात्र, पालिका प्रशासन, शासन कर्तव्य पार पाडत नसल्याने वाद चिघळला आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनी भाग घेतल्याने वारणा काठाला बळ मिळाले आहे.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर