शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शिरोळला ‘गावठी’ जोरात

By admin | Updated: July 3, 2015 00:54 IST

कारवाईचा फार्सच : राजरोस विक्री, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

जयसिंगपूर : मालवणी विषारी दारूकांडाच्या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र, ही कारवाई निव्वळ फार्सच ठरत आहे. धाडी पडतात, दारूचे रसायन नष्ट केले जाते; मात्र संशयित आरोपी फरार होतात, असेच चित्र आहे. एकीकडे ही कारवाई होत असताना तालुक्यात अनेक धाबे, हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी आहेत. इचलकरंजी विभागांतर्गत राज्य शासनाचा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे. एखाद्या घटनेनंतरच किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी आणि गावठी दारूला आळा घालण्यासाठी कारवाईची मोहीम उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून राबविली जाते. मुंबईच्या मालवणी विभागात विषारी दारूचे सेवन करून शंभरपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर शासनाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित विभागाकडून शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. दानोळी येथे तीन दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, संशयित आरोपी कारवाईवेळी फरार झाले, अशीच कारवाई दिसून आली आहे. अशी दारू तयार करणाऱ्या संबंधितांवर आजपर्यंत ठोस कारवाईच न झाल्यामुळे व यामागे अर्थकारण लपल्यामुळे कारवाईनंतर पुन्हा हे दारूअड्डे जोमाने सुरू होतात, सध्याही असेच चित्र आहे. (प्रतिनिधी)महिन्याकाठी अर्थकारणगेल्या तीन-चार वर्षांत शिरोळ तालुक्यात परमिट रूम-बीअर बारच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात सुमारे ११६ परमिट रूम-बीअर बार असून, या व्यवसायिकांवर जुजबी कर वसूल करण्यात येत आहे. महिन्याकाठी अर्थकारण होत असल्यामुळे नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजरोस विक्रीशिरोळ तालुक्यात दानोळी, शिरोळ, दानवाड परिसरात हातभट्ट्या आणि गावठी दारूचे अड्डे आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या भागात दारू बनविली जाते. प्रामुख्याने इचलकरंजी, सांगली भागात या ठिकाणाहून छुप्या मार्गाने ती विकली जाते. यामुळे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.