शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अहिंसेमुळे नर्मदा लढ्याला धार- शिल्पा बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:17 IST

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ५० हजार कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. हक्काचे घर, जमीन, पाण्यासाठी त्यांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. आदिवासींमधील अहिंसा आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यामुळे या लढ्याची धार अजूनही बोथट झालेली नाही, असे मनोगत निर्मात्या-दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअहिंसेमुळे नर्मदा लढ्याला धार- शिल्पा बल्लाळ ‘लकीर के इस तरफ’ माहितीपटाचे प्रदर्शन

कोल्हापूर : नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ५० हजार कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. हक्काचे घर, जमीन, पाण्यासाठी त्यांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. आदिवासींमधील अहिंसा आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यामुळे या लढ्याची धार अजूनही बोथट झालेली नाही, असे मनोगत निर्मात्या-दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांनी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे नर्मदा बचाव आंदोलन आणि तेथील आदिवासींच्या स्थितीवर शिल्पा बल्लाळ निर्मित ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, मी या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता नाही. मेधातार्इंच्या चळवळीची सुरुवात झाली त्या मणिबेली येथे त्यांच्यासोबत जाण्याची संधी मला मिळाली आणि मी या विषयाशी जोडले गेले. जुलैै २०१८ ते मे २०१९ या कालावधीत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी २४५ गावे पाण्याखाली गेली. आजही या विस्थापितांचे पुनर्वसन झालेले नाही.

हातात तीर-कमान असूनही हे आदिवासी शांतपणे सरकारशी लढा देत आहेत. माझ्या नजरेतून उलगडलेला लढा मी या माहितीपटातून मांडत आहे. ‘नर्मदा आंदोलन’ हे केवळ नाव माहीत असलेल्या आणि हे आंदोलन आता संपले आहे, असे समजणाऱ्या शहरातील सर्वसामान्य माणसांना याचे वास्तव समजावे, अशी माझी अपेक्षा आहे. अनघा पेंढारकर यांनी स्वागत केले. उदय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :Damधरणcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर