शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक

By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 13:38 IST

संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला

एकेकाळी आशिया खंडात नावलौकिक असलेला व डोळे झाकून खरेदी करावी, असा ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या शेतकरी सहकारी संघाची अवस्था आता खूपच वाईट झाली आहे. संघ हा सहकारी संस्था असली तरी खरेदी-विक्री संस्था आहे. मार्केटिंगचा गाढा अभ्यास व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या ताब्यात संघाच्या चाव्या होत्या तोपर्यंत संघाचा ‘बैल’ धष्टपुष्ट होता. मात्र, संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला. संघाची सध्याची अवस्था व आगामी काळात ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय करायला हवे, याचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून..

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्राहकांना ‘मॉल’ संस्कृतीकडे आकर्षित करण्याचे काम शेतकरी सहकारी संघाने केले. संघाच्या बझारमधील कोणतीही वस्तू ग्राहक अक्षरश: डोळे झाकून खरेदी करत होते, इतका विश्वास संघावर होता. त्याला कर्मचाऱ्यांबरोबरच संघाचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या नि:स्वार्थी नेतृत्व कारणीभूत होते.पण, अलीकडील वीस-पंचवीस वर्षांत पूर्वीच्या नेतृत्वांनी मेहनतीने समाजमनात निर्माण केलेला विश्वासाचा चिरा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. संघात विश्वस्त म्हणून केलेले गब्बर झाले; पण संघ अधिकच अशक्त होत गेला. नेत्यांनी सध्याच्या विश्वस्तांचे वेळीच कान उपटले नाही तर सहकाराचे आदर्श मंदिर जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही.शेतकरी व ग्राहकांना माफक दरात वस्तू मिळाव्यात, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली. स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर आदी मंडळींनी अगदी साचेबद्ध कारभार करत संघाचे नाव आशिया खंडात नेले. संघाच्या नावलौकिक वाढण्यासाठी जेवढे योगदान विश्वस्तांचे होते, तेवढेच तत्कालीन कर्मचाऱ्यांचेही आहे. माल खरेदीपासून विक्रीपर्यंतची पारदर्शकता आणि विश्वासावर संघाचा डोलारा उभा होता. पण, सर्वपक्षीय अराजकीय मंडळींच्या हातून संघाच्या दोऱ्या सुटल्या आणि अधोगतीला सुरुवात झाली.

साखर कारखाना तिथे पंपशेतकरी संघ ही जिल्ह्यातील ताकदवान संस्था होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून कार्यस्थळावर पेट्रोलपंपासह शाखा सुरू करण्याचा आग्रह असायचा. एवढी मोठी गुंतवणूक व व्यवसायाची असल्याने कारखान्यांनी स्वत:ची जागा देऊन शाखा सुरू करण्यास सांगितले. संघाच्या विस्तारात हेही मुख्य कारण होते.

भरकटलेले जहाज..संघाचा कारभार दृष्ट लागण्यासारखा होता; पण १९९९ पासून संघाचे जहाज भरकटण्यास सुरुवात झाली. ते गेली २५ वर्षे किनाऱ्यावर आलेच नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी