शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक

By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 13:38 IST

संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला

एकेकाळी आशिया खंडात नावलौकिक असलेला व डोळे झाकून खरेदी करावी, असा ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या शेतकरी सहकारी संघाची अवस्था आता खूपच वाईट झाली आहे. संघ हा सहकारी संस्था असली तरी खरेदी-विक्री संस्था आहे. मार्केटिंगचा गाढा अभ्यास व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या ताब्यात संघाच्या चाव्या होत्या तोपर्यंत संघाचा ‘बैल’ धष्टपुष्ट होता. मात्र, संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला. संघाची सध्याची अवस्था व आगामी काळात ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय करायला हवे, याचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून..

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्राहकांना ‘मॉल’ संस्कृतीकडे आकर्षित करण्याचे काम शेतकरी सहकारी संघाने केले. संघाच्या बझारमधील कोणतीही वस्तू ग्राहक अक्षरश: डोळे झाकून खरेदी करत होते, इतका विश्वास संघावर होता. त्याला कर्मचाऱ्यांबरोबरच संघाचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या नि:स्वार्थी नेतृत्व कारणीभूत होते.पण, अलीकडील वीस-पंचवीस वर्षांत पूर्वीच्या नेतृत्वांनी मेहनतीने समाजमनात निर्माण केलेला विश्वासाचा चिरा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. संघात विश्वस्त म्हणून केलेले गब्बर झाले; पण संघ अधिकच अशक्त होत गेला. नेत्यांनी सध्याच्या विश्वस्तांचे वेळीच कान उपटले नाही तर सहकाराचे आदर्श मंदिर जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही.शेतकरी व ग्राहकांना माफक दरात वस्तू मिळाव्यात, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली. स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर आदी मंडळींनी अगदी साचेबद्ध कारभार करत संघाचे नाव आशिया खंडात नेले. संघाच्या नावलौकिक वाढण्यासाठी जेवढे योगदान विश्वस्तांचे होते, तेवढेच तत्कालीन कर्मचाऱ्यांचेही आहे. माल खरेदीपासून विक्रीपर्यंतची पारदर्शकता आणि विश्वासावर संघाचा डोलारा उभा होता. पण, सर्वपक्षीय अराजकीय मंडळींच्या हातून संघाच्या दोऱ्या सुटल्या आणि अधोगतीला सुरुवात झाली.

साखर कारखाना तिथे पंपशेतकरी संघ ही जिल्ह्यातील ताकदवान संस्था होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून कार्यस्थळावर पेट्रोलपंपासह शाखा सुरू करण्याचा आग्रह असायचा. एवढी मोठी गुंतवणूक व व्यवसायाची असल्याने कारखान्यांनी स्वत:ची जागा देऊन शाखा सुरू करण्यास सांगितले. संघाच्या विस्तारात हेही मुख्य कारण होते.

भरकटलेले जहाज..संघाचा कारभार दृष्ट लागण्यासारखा होता; पण १९९९ पासून संघाचे जहाज भरकटण्यास सुरुवात झाली. ते गेली २५ वर्षे किनाऱ्यावर आलेच नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी