शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'शरद पवारांनी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले, पण...' शाहू छत्रपती यांची स्पष्टोक्ती

By विश्वास पाटील | Updated: January 7, 2023 00:13 IST

Shahu Chhatrapati : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न केले; परंतू या ना त्या कारणाने ते घडलं नाही, असे शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

- विश्वास पाटील कोल्हापूर - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न केले; परंतू या ना त्या कारणाने ते घडलं नाही, असे शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. निमित्त होतं त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त छत्रपती शाहू विद्यालयामार्फत शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे. या मुलाखतीत शाहू महाराज यांनी सर्वच प्रश्र्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

माजी नगरसेवक नियाज खान यांनी त्यांना राजकारणाविषयी प्रश्र्न विचारला. तुमचे सोनिया गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते; मग कोणत्या पक्षात जावे असे वाटले नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर शाहू छत्रपती म्हणाले, या तिन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध होते व आहेत. सोनिया गांधी यांच्याशी मालोजीराजे यांच्या उमेदवारीवेळी संबंध आला व त्यांनी मालोजीराजे यांना लगेच उमेदवारी दिली. पवार यांच्याशी तर माझे गेल्या ५० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांनीही माझ्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. नंतरच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राजकीय संबंध आले. त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला सांगितला. त्यांच्या आग्रहाखातर मी प्रवेश केला. परंतू उमेदवारीचं मात्र घडलं नाही.

कुस्ती आणि मल्लखांब यासारखे पारंपरिक खेळ रुजले पाहिजेत, त्यासाठी सरकारने प्रशिक्षण वर्ग आणि स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षा शाहू महाराजांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. शाहू महाराजांनी उद्यमनगर, शाहूपुरी उभारली. भविष्यातही इथे अनेक उद्योगधंदे येतील, त्यांना प्रोत्साहन द्या. यासाठी अनेक परप्रांतीय इथे आले आहेत, त्यांनाही संरक्षण द्या, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी स्मरणिकेचे प्रकाशन आणि आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याच्या ध्वनिचित्रफितीचे अनावरण त्यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाला संग्रामसिंह, युवराज संभाजीराजे आणि मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, युवराज शहाजीराजे, यशस्विनी आणि यशराजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांविषयी आस्था...शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे, अनेक योजना सुरू आहेत, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, याची खंत व्यक्त करून त्यांनी, कष्टाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. कोल्हापुरात जो विचार मांडला जातो, तो महाराष्ट्रात, देशात रुजतो, असे सांगून शाहू महाराजांच्या वास्तू, वारसास्थळे जपा, असे आवाहन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर