शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

इतिहासाच्या विषारीकरणामुळेच शंभुराजांची बदनामी : आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:50 IST

इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभुराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्दे इतिहासाच्या विषारीकरणामुळेच शंभुराजांची बदनामी : आनंद पाटील ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकाच्या लेखिकेसह संबंधितांवर गुन्हे दाखल करा : शंभुराजे सन्मान परिषदेत ठराव

कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभुराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.शाहू स्मारक भवनात मराठा महासंघातर्फे आयोजित शंभुराजे सन्मान परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, डॉ. विलास पोवार, ज्येष्ठ पत्रकार पी. बी. पोवार, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, इस्माईल पठाण, गणी आजरेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.परिषदेमध्ये शंभुराजेंची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह सरकारबद्दल मान्यवरांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी इंद्रजित माने यांनी मांडलेल्या ठरावांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली.आनंद पाटील म्हणाले, आपला इतिहास जवळच आहे; परंतु तो आपल्याला दिसत नाही. आपण याबाबत अभ्यास करीत नाही. कुठला तरी जुना कागद शोधायचा आणि त्याचे भाषांतर करायचे या पलीकडे आपण जात नाही. येथील इतिहासाचे पुरावे नष्ट करण्यात आले असून, खऱ्या इतिहासाचे संशोधन हे परदेशातच होत आहे.डॉ. मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी व शंभुराजे यांची बदनामी ही राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. ती पुस्तकापुरती मर्यादित नसून ‘राजसंन्यास,’ ‘बेबंदशाही’ अशा नाटकांमधूनही सुरू आहे. त्यामुळे या नाटकांवरही बंदी घातली पाहिजे.इंद्रजित सावंत म्हणाले, जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत बदनामीचे षड्यंत्र सुरूच राहणार आहे; त्यामुळे नुसती ही परिषद घेऊन न थांबता या पुस्तकांची सरकार जाहीर होळी करीत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही.विलास पोवार म्हणाले, इतिहासाचे पुनर्संशोधन होऊनही बदनामी सुरूच आहे. पी. बी. पोवार म्हणाले, आपल्यातील उणिवांमुळे व दुर्लक्षामुळे असे प्रकार होत आहेत. पठाण म्हणाले, कोणतेही पुरावे नसताना शंभुराजेंच्या बदनामीचा मजकूर छापण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. मुळीक यांनी शंभुराजेंची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत संबंधितांना त्याच भाषेत उत्तर देऊ, असे सांगितले. बबन रानगे यांनी स्वागत केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन व शिरीष जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य