शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:23 IST

गडहिंग्लजला सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको, २२ जणांना ताब्यात घेऊन सोडले

गडहिंग्लज : भूमिपुत्रांना संकटात टाकणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून शक्तिपीठांना शक्ती मिळणार नाही. त्यासाठी भक्तांच्या खिशातूनच टोलवसुली होणार आहे. त्यामुळे ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नसून अदानींच्या भल्यासाठीच सुरू आहे. यातून ठेकेदारांना पोसून ५० हजार कोटींवर हात मारण्याचा राज्यकर्त्यांचा घाट आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे येथील संकेश्वर-बांदा महामार्गावर आयोजित रास्ता रोको आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शक्तिपीठ महामार्गात चंदगड मतदारसंघाचा समावेशाची मागणी करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला. रास्ता रोकोप्रकरणी पोलिसांनी शेट्टी, आमदार राजेश पाटील यांच्यासह २२ प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले.राजेश पाटील म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर ‘चंदगड’च्या विकासासाठी विधायक पावले टाकल्यास पाठिंबा देण्याची ग्वाहीसह आमदारांना शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, पर्यटन रोजगारवाढीच्या नावाखाली त्यांची शक्तिपीठाची मागणी शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवणारी आहे. मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्यासाठीच त्यांनी चुकीची मागणी केली आहे. पराभूत मंडळी एकत्र आल्याचा त्यांचा कांगावाही हास्यास्पद आहे.कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठाच्या नावाखाली धार्मिक भावना गोंजारण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारच्या भूलथापांना राज्यातील शेतकरी बळी पडणार नाही. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण व काळ्या आईच्या सन्मानाची लढाई ताकदीने लढवू. ‘चंदगड’च्या मातीला हातदेखील लावू देणार नाही.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, स्वाती कोरी, राजेंद्र गड्यान्नावर, कॉ. सम्राट मोरे, बाळेश नाईक, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, जयसिंग चव्हाण, अमर चव्हाण, नितीन पाटील यांचीही भाषणे झाली. आंदोलनात रामाप्पा करिगार, अंजना रेडेकर, कृष्णा भारतीय, अभयकुमार देसाई, शिवप्रसाद तेली, रियाज शमनजी, रामदास कुराडे, अजित खोत, बाळासाहेब गुरव, शिवाजी होडगे, रामदास कुराडे आदी सहभागी झाले होते.

ठेकेदारांच्या बिलासाठी भांडामुख्यमंत्र्यांना खूश करून काहीतरी मिळवण्यासाठीच त्यांनी शक्तिपीठाची मागणी केली आहे. त्याऐवजी राज्यातील ठेकेदारांच्या थकीत ९० हजार कोटींच्या बिलांसाठी विधानसभेत आंदोलन करावे, असा टोलाही खासदार शेट्टी यांनी आमदार पाटील यांना लगावला.

म्हणूनच पक्षीय बंधने बाजूलायापूर्वी विमानतळ, हेलिकॉप्टर मागितलेल्या शिवाजीरावांनी आता शक्तिपीठाची मागणी केली आहे. त्यामुळे काळ्या आईसह भूमीपुत्रांवर संकट आले आहे. म्हणूनच, पक्षीय बंधने बाजूला ठेवून आपण शक्तिपीठाच्या विरोधात उभे आहोत, असे भाजपाचे संग्राम कुपेकर यांनी स्पष्ट केले.

आता आम्हीच त्यांना आपटणार..!शाळकरी मुलांसाठी गाड्या सोडणार यासह त्यांच्या अनेक घोषणा अजूनही हवेतच आहेत. काहीतरी करतील म्हणून निवडणुकीत आम्हीच उचलून धरले. परंतु, शेतकरीविरोधी शक्तिपीठाची मागणी केल्यामुळे आता आम्हीच त्यांना आपटल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा‘मनसे’ जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला.