शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

शाहू स्मारकालाही अनागोंदीचे ग्रहण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : नवे काही घडत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:52 IST

कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली

ठळक मुद्देशासकीय अधिकारी व पदाधिकारी असतानाही शाहू स्मारक भवनकडे सर्वांचेच साफ दुर्लक्ष झाले आहे.सहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जातीने लक्ष घालून शाहू स्मारकचा कायापालट केलाशाहूंच्या नावाने चालविल्या जाणाºया या वास्तूसंबंधी अधिक दक्षतेने कामकाज होणे गरजेचे आहे.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली विश्वस्तांची नियुक्ती, गळका हॉल, नूतनीकरणाचा अभाव, एकहाती कारभार, पारदर्शकतेचा अभाव अशा भोवऱ्यांचा विळखा भवनाला बसला आहे.

दसरा चौकातील ‘शाहू स्मारक भवन’ ही केवळ वास्तू नव्हे, तर ती पुरोगामी कोल्हापूरच्या इतिहासाची साक्षीदार आहे. या वास्तूत अनेक चळवळी आकाराला आल्या आणि तडीस गेल्या. या वास्तूच्या नावे असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी काम पाहतात. याशिवाय दोन विश्वस्त, महापौर, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कुलगुरू, सार्वजनिक बांधकामचे अभियंता हे सदस्य आहेत. एवढे सगळे शासकीय अधिकारी व पदाधिकारी असतानाही शाहू स्मारक भवनकडे सर्वांचेच साफ दुर्लक्ष झाले आहे.

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जातीने लक्ष घालून शाहू स्मारकचा कायापालट केला, सांस्कृतिक उपक्रम राबविले. त्यानंतर मात्र एकाही जिल्हाधिकाºयांनी यात रस घेतला नाही. शाहू पुरस्कार, व्याख्यानमाला असे मोजके कार्यक्रम सोडले तर ट्रस्टकडून फार काही घडत नाही. नियमित बैठका होत नसल्याने अडचणींवर चर्चा होत नाही.

ट्रस्टवर विश्वस्त म्हणून सध्या केवळ ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार हे आहेत; तर डॉ. अशोक चौसाळकर हे निमंत्रित आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी नवी नियुक्तीच झालेली नाही. अभ्यासिकेचा प्रस्ताव फाईलबंद आहे. नूतनीकरणादरम्यान झालेल्या काही चुकांमुळे पावसाळ्यात व्यासपीठावरच पाणी गळते. दुसरीकडे, वास्तूची व स्वच्छतागृहाची साफसफाई होत नाही. वास्तूचा नीटनेटकेपणा, आकर्षकता, पिण्याचे पाणी, कार्यक्रमाची माहिती लावण्यासाठी सुस्थितीतीलस्टॅँडी, अशा मूलभूत सोर्इंचाही अभाव आहे. शाहूंच्या नावाने चालविल्या जाणाºया या वास्तूसंबंधी अधिक दक्षतेने कामकाज होणे गरजेचे आहे.रेस्ट हाऊस बंदमुख्य इमारतीमागील रेस्ट हाऊस टेंडर नोटिसीद्वारे चालवायला दिले जायचे. त्यातून वर्षाला चार लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ही प्रक्रियाच केली गेली नाही. जी प्रक्रिया झाली ती चुकीची होती. व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने मोठा फटका बसला आहे. आता त्याला गळतीच लागली आहे. जे लोक येथे राहायला येतात, त्यांची नोंदच होत नाही, अशी तक्रार आहे.आर्थिक अडचणीधर्मादाय अंतर्गत असलेल्या शाहू स्मारक भवनाची वार्षिक उलाढाल जवळपास ५० लाख इतकी आहे. ट्रस्टला शासनाकडून एक रुपयाही मिळत नाही. तीन हॉल व दोन कलादालनांच्या बुकिंगमधूनच उत्पन्न मिळते. रोजचा खर्च दहा ते बारा हजारांच्या आसपास आहे; त्यामुळे ट्रस्टकडे निधी नाही. त्यातून नूतनीकरण रखडले आहे. येथे सगळे व्यवहार रोखीने होतात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नाही, साहित्य परस्पर भाडेतत्त्वावर दिले जाते, अधिकच्या सेवा व साहित्यासाठी वाढीव भाडे द्यावे लागते, आगाऊ बुकिंग करून अडवणूक होते, काही ठिकाणी अनावश्यक खर्च दाखविला जातो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर