शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शाहू महाराजांमुळे बहुजन पत्रकारितेला बळ : अलोक जत्राटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:46 IST

शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलोक जत्राटकर यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देशाहू महाराजांमुळे बहुजन पत्रकारितेला बळ : अलोक जत्राटकरराजर्षी शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलोक जत्राटकर यांनी सोमवारी केले.शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार होते. व्यासपीठावर डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.जत्राटकर म्हणाले, वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांना अभिजन वर्गाकडून मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीची झळ बसली होती. त्यामुळे बहुजनांवरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांना शहाणं करणारे वृत्तपत्रे निघावीत अशी त्यांची इच्छा होती. दिनमित्र, विजयी मराठा, शिवछत्रपती, तरुण मराठा अशा अनेक बहुजन वृत्तपत्रांना त्यांनी अर्थसाहाय्य केले. किंबहुना महाराजांच्या पाठबळामुळेच या वृत्तपत्रांनी तग धरला.’डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘शाहू महाराजांच्या अनेक पैलूंपैकी प्रकाशझोतात न आलेला प्रयोग म्हणजे पत्रकारिता. बहुजनांच्या जागृतीसाठी वृत्तपत्राचा आधार घ्यावा ही जाणीव शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणापासून झाली. पत्रकारिता या चळवळीचे सामर्थ्य शाहू महाराजांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी अनेक नियतकालिके, वृत्तपत्रांना मदत केली. त्यावेळची पत्रकारिता ही विशेषता बहुजनांची पत्रकारिता ही ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ दारिद्र्य आणि गांजलेल्या उपेक्षित समाजासाठीच्या चळवळीचे माध्यम होते.डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ