शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. एन. डी. पाटील यांची वैचारीक दैवतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:22 IST

कोल्हापूर : प्रा. एन. डी. पाटील हे आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. जेव्हा राजकारण कळायला लागले तेव्हा शेका पक्षाचा ...

कोल्हापूर : प्रा. एन. डी. पाटील हे आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. जेव्हा राजकारण कळायला लागले तेव्हा शेका पक्षाचा लाल झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला त्याला अखेरचा श्वास घेईपर्यंत कधीच अंतर दिले नाही. उभी हयात एका पक्षात राहण्याचे तसे एन.डी.सर हे देशाच्या राजकारणातील फारच दुर्मिळ उदाहरण असावे. पाच वर्षांत दोन पक्ष बदलण्याच्या काळात त्यांची वैचारिक व पक्षीय निष्ठा अधिकच झळाळून दिसत असे.शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. पाटील यांची वैचारीक दैवतेच. त्यांच्याच विचारांच्या आधारे ते सारे जीवन जगले. त्यामुळे त्यांच्या दिवाणखान्यात शाहू महाराज व कर्मवीर अण्णांचा पुतळा ठेवलेला असे. अलीकडील काही वर्षांत त्या पुतळ्याशेजारी त्यांचे शेका पक्षाचे निवडणूक चिन्हे असलेली बैलगाडीही दिमाखात उभी असे.गोरगरीब कष्टकऱ्यांच्या श्रमाचेच ते प्रतीक. सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्यांवर सत्कार झाला तेव्हा त्यांना सभासदांनी ही बैलगाडी भेट दिली होती. औंध येथील कुंभार बांधवाने ही बैलगाडी अत्यंत सुबक व बारकाव्यासह बनवली होती. सोमवारी प्रा. पाटील शाहू महाराज, कर्मवीर अण्णांच्या वाटेने निघून गेले. विचारांच्या व बैलगाडीच्या रुपाने निष्ठेच्या आठवणी मागे ठेवून...प्रा. पाटील हे कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील निवासस्थानी गेली वीस-बावीस वर्षे राहत होते. सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यावर प्रा. पाटील हे सुरुवातीला काही वर्षे मुंबईला खार परिसरात राहत होते. परंतु लोकांसाठी संघर्ष करत राहणे हे सरांचे टॉनिक. त्यामुळे मुंबईत राहून पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला त्यांच्याशी संपर्क साधणे, भेटणे अडचणीचे होईल म्हणून त्यांनी कोल्हापुरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरातील त्यांचे निवासस्थान कायमच गोरगरीब लोकांचे न्याय मागायला जाण्याचे हक्काचे ठिकाण होते. त्यांचा दरवाजा कायमच उघडा होता.व्यक्तिगत अन्याय, सामाजिक प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे यायचे. प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करून मगच प्रा. पाटील हे त्या प्रश्नांत उतरायचे. त्यामुळे एखाद्या प्रश्नावर ते कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकाऱ्याच्या छातीत धडधड व्हायची. थातुरमातुर उत्तर दिलेले त्यांना आवडत नसे. त्या अधिकाऱ्याच्या मर्यादा किती आहेत हे पण लक्षात घेऊन घाव मंत्रालयात घालायला पाहिजे की कुठे हे ताडायचे. अलीकडील काही वर्षांत त्यांच्या बंगल्यातील बाहेरील खोली हे लोकांच्या भेटीचे केंद्र बनले होते. आज, सोमवारी मात्र ही खोलीसुद्धा रितेपण अनुभवत उदासपण अनुभवत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील