शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:50 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे स्मारकाचे थाटात लोकार्पण

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले असोत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांनी देशासमोर प्रागतिक विचार ठेवला. उपेक्षित समाजाला ऊर्जा दिली. आज असाच प्रागतिक विचार नव्याने पुढे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहेत. त्यास जनतेचे आशीर्वाद असतील. त्यांनी पुढाकार घेतल्यास कोल्हापूरचा प्रागतिक विचार महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांत जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी रात्री येथे व्यक्त केली.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या प्रतिभानगरातील स्मारकाचे लोकार्पण मंगळवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती हाेते. व्यासपीठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भालचंद्र कांगो, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाला नेहमीच दिशा दिली. शाहू छत्रपती महाराजांकडूनही हा विचार जपला जाईल, म्हणून जनतेला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहेत. म्हणूनच मला शाहूराजेंना विनंती करायची आहे, त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून पवार यांनी शाहू छत्रपतींनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे अप्रत्यक्ष जाहीरच करून टाकले.पवार म्हणाले, सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरायची असते, ही भूमिका शाहू महाराजांनी जपली; परंतु ज्यांच्या हातात देशात सत्ता आहे, त्यांना जरासुद्धा सर्वसामान्य जनतेविषयी आस्था नाही. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करायची असते, अशा लोकसभेत देशाचे पंतप्रधान केवळ वीस मिनिटांसाठी आले. पुन्हा त्यांनी ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. आज देशात लोकांना भलतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधात भूमिका मांडणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. वृत्तवाहिन्या बंद करण्याचा आदेश काढला जातो आहे. सत्तेविरोधात बोलणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले जात आहे. हे रोखण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.

विचाराने लढण्याची गरज : शाहू महाराजशाहू महाराज म्हणाले, ‘देशाची घटना इतकी मजबूत आहे की, ती कोणीही मोडू शकणार नाही. तीच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. इतका अस्थिरपणा मागच्या ७५ वर्षांत कधीही झाला नाही. पक्षांतर्गत कायदा कमी पडला किंवा त्यास बगल देऊन सत्ता हस्तगत करू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न गेल्या दीड- दोन वर्षांत झाला. पक्षांतर का होते, हे आता सगळ्यांना माहीत आहे. प्रतिगामी शक्तीविरोधात, आवाज दडपणाऱ्यांविरोधात आज विचाराने लढायची वेळ आली आहे. कुठे तलवार घेऊन लढायला जायची गरज नाही. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होऊ शकते. आपणाला दिशा ठरवावी लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार