शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:50 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे स्मारकाचे थाटात लोकार्पण

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले असोत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांनी देशासमोर प्रागतिक विचार ठेवला. उपेक्षित समाजाला ऊर्जा दिली. आज असाच प्रागतिक विचार नव्याने पुढे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहेत. त्यास जनतेचे आशीर्वाद असतील. त्यांनी पुढाकार घेतल्यास कोल्हापूरचा प्रागतिक विचार महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांत जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी रात्री येथे व्यक्त केली.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या प्रतिभानगरातील स्मारकाचे लोकार्पण मंगळवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती हाेते. व्यासपीठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भालचंद्र कांगो, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाला नेहमीच दिशा दिली. शाहू छत्रपती महाराजांकडूनही हा विचार जपला जाईल, म्हणून जनतेला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहेत. म्हणूनच मला शाहूराजेंना विनंती करायची आहे, त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून पवार यांनी शाहू छत्रपतींनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे अप्रत्यक्ष जाहीरच करून टाकले.पवार म्हणाले, सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरायची असते, ही भूमिका शाहू महाराजांनी जपली; परंतु ज्यांच्या हातात देशात सत्ता आहे, त्यांना जरासुद्धा सर्वसामान्य जनतेविषयी आस्था नाही. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करायची असते, अशा लोकसभेत देशाचे पंतप्रधान केवळ वीस मिनिटांसाठी आले. पुन्हा त्यांनी ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. आज देशात लोकांना भलतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधात भूमिका मांडणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. वृत्तवाहिन्या बंद करण्याचा आदेश काढला जातो आहे. सत्तेविरोधात बोलणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले जात आहे. हे रोखण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.

विचाराने लढण्याची गरज : शाहू महाराजशाहू महाराज म्हणाले, ‘देशाची घटना इतकी मजबूत आहे की, ती कोणीही मोडू शकणार नाही. तीच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. इतका अस्थिरपणा मागच्या ७५ वर्षांत कधीही झाला नाही. पक्षांतर्गत कायदा कमी पडला किंवा त्यास बगल देऊन सत्ता हस्तगत करू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न गेल्या दीड- दोन वर्षांत झाला. पक्षांतर का होते, हे आता सगळ्यांना माहीत आहे. प्रतिगामी शक्तीविरोधात, आवाज दडपणाऱ्यांविरोधात आज विचाराने लढायची वेळ आली आहे. कुठे तलवार घेऊन लढायला जायची गरज नाही. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होऊ शकते. आपणाला दिशा ठरवावी लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार