शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:46 IST

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत.

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक आठजणांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक वेळा निवडून गेलेल्यांची संख्या एकतीस असून शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची निवड सलग पाचव्यांदा झाली आहे. उर्वरित सर्वजण एकापेक्षा अधिक आणि जास्तीत जास्त चारवेळा निवडले गेले आहेत.प्रथमच निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजप आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस एक, अपक्ष १ आणि एमआयएम एक अशी विभागणी आहे. शिवसेनेमध्ये हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) यांचा समावेश आहे.भाजपमध्ये आठ जणांचा समावेश आहे. त्यात डॉ. भारती पवार (दिंडोरी), मनोज कोटक (मुंबई-ईशान्य), उन्मेश पाटील (जळगाव), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), गिरीष बापट (पुणे), सुजय विखे (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (माढा).राष्ट्रवादीने दोन नवे चेहरे दिले आहेत. त्यात सुनील तटकरे (रायगड) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा (अमरावती) या प्रथमच विजयी झाल्या आहेत. शिवाय औरंगाबादमधून सातत्याने निवडून येणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलिल (एमआयएम) यांनी लोकसभेत प्रवेश केला आहे. काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार महाराष्ट्रातून विजयी झाला आहे. आणि त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचा ऐनवेळी राजीनामा देऊन काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि ते निवडूनही आले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) हे दोघेही पाचव्यांदा निवडून आले आहेत. गिरीष बापट (भाजप-पुणे) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी-रायगड) त्यांच्या पक्षात ज्येष्ठ नेते मानले जातात. ते राजकारणात नवखे नाहीत, पण लोकसभेत प्रथमच प्रवेश करत आहेत. बापट सध्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. विद्यमान मंत्रिमंडळातील ते एकमेव मंत्री लोकसभा निवडणुकीत उतरले होते.>अचानक प्रवेश, विजयही मिळविलाडॉ. भारती पवार (राष्ट्रवादी ते भाजप), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (काँग्रेस ते भाजप), धैर्यशील माने (राष्ट्रवादी ते शिवसेना), धानोरकर (शिवसेना ते काँग्रेस), सुजय विखे (काँग्रेस ते भाजप), जयसिद्धेश्वर स्वामी (मठातून थेट भाजपमध्ये), डॉ. अमोल कोल्हे (शिवसेना ते राष्ट्रवादी) आदी सातजणांनी लोकसभेपूर्वी पक्षांतर करून उमेदवारी घेतली आणि विजयीसुद्धा झाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९