शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:46 IST

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत.

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक आठजणांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक वेळा निवडून गेलेल्यांची संख्या एकतीस असून शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची निवड सलग पाचव्यांदा झाली आहे. उर्वरित सर्वजण एकापेक्षा अधिक आणि जास्तीत जास्त चारवेळा निवडले गेले आहेत.प्रथमच निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजप आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस एक, अपक्ष १ आणि एमआयएम एक अशी विभागणी आहे. शिवसेनेमध्ये हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) यांचा समावेश आहे.भाजपमध्ये आठ जणांचा समावेश आहे. त्यात डॉ. भारती पवार (दिंडोरी), मनोज कोटक (मुंबई-ईशान्य), उन्मेश पाटील (जळगाव), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), गिरीष बापट (पुणे), सुजय विखे (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (माढा).राष्ट्रवादीने दोन नवे चेहरे दिले आहेत. त्यात सुनील तटकरे (रायगड) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा (अमरावती) या प्रथमच विजयी झाल्या आहेत. शिवाय औरंगाबादमधून सातत्याने निवडून येणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलिल (एमआयएम) यांनी लोकसभेत प्रवेश केला आहे. काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार महाराष्ट्रातून विजयी झाला आहे. आणि त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचा ऐनवेळी राजीनामा देऊन काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि ते निवडूनही आले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) हे दोघेही पाचव्यांदा निवडून आले आहेत. गिरीष बापट (भाजप-पुणे) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी-रायगड) त्यांच्या पक्षात ज्येष्ठ नेते मानले जातात. ते राजकारणात नवखे नाहीत, पण लोकसभेत प्रथमच प्रवेश करत आहेत. बापट सध्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. विद्यमान मंत्रिमंडळातील ते एकमेव मंत्री लोकसभा निवडणुकीत उतरले होते.>अचानक प्रवेश, विजयही मिळविलाडॉ. भारती पवार (राष्ट्रवादी ते भाजप), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (काँग्रेस ते भाजप), धैर्यशील माने (राष्ट्रवादी ते शिवसेना), धानोरकर (शिवसेना ते काँग्रेस), सुजय विखे (काँग्रेस ते भाजप), जयसिद्धेश्वर स्वामी (मठातून थेट भाजपमध्ये), डॉ. अमोल कोल्हे (शिवसेना ते राष्ट्रवादी) आदी सातजणांनी लोकसभेपूर्वी पक्षांतर करून उमेदवारी घेतली आणि विजयीसुद्धा झाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९