शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:46 IST

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत.

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक आठजणांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक वेळा निवडून गेलेल्यांची संख्या एकतीस असून शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची निवड सलग पाचव्यांदा झाली आहे. उर्वरित सर्वजण एकापेक्षा अधिक आणि जास्तीत जास्त चारवेळा निवडले गेले आहेत.प्रथमच निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजप आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस एक, अपक्ष १ आणि एमआयएम एक अशी विभागणी आहे. शिवसेनेमध्ये हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) यांचा समावेश आहे.भाजपमध्ये आठ जणांचा समावेश आहे. त्यात डॉ. भारती पवार (दिंडोरी), मनोज कोटक (मुंबई-ईशान्य), उन्मेश पाटील (जळगाव), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), गिरीष बापट (पुणे), सुजय विखे (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (माढा).राष्ट्रवादीने दोन नवे चेहरे दिले आहेत. त्यात सुनील तटकरे (रायगड) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा (अमरावती) या प्रथमच विजयी झाल्या आहेत. शिवाय औरंगाबादमधून सातत्याने निवडून येणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलिल (एमआयएम) यांनी लोकसभेत प्रवेश केला आहे. काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार महाराष्ट्रातून विजयी झाला आहे. आणि त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचा ऐनवेळी राजीनामा देऊन काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि ते निवडूनही आले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) हे दोघेही पाचव्यांदा निवडून आले आहेत. गिरीष बापट (भाजप-पुणे) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी-रायगड) त्यांच्या पक्षात ज्येष्ठ नेते मानले जातात. ते राजकारणात नवखे नाहीत, पण लोकसभेत प्रथमच प्रवेश करत आहेत. बापट सध्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. विद्यमान मंत्रिमंडळातील ते एकमेव मंत्री लोकसभा निवडणुकीत उतरले होते.>अचानक प्रवेश, विजयही मिळविलाडॉ. भारती पवार (राष्ट्रवादी ते भाजप), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (काँग्रेस ते भाजप), धैर्यशील माने (राष्ट्रवादी ते शिवसेना), धानोरकर (शिवसेना ते काँग्रेस), सुजय विखे (काँग्रेस ते भाजप), जयसिद्धेश्वर स्वामी (मठातून थेट भाजपमध्ये), डॉ. अमोल कोल्हे (शिवसेना ते राष्ट्रवादी) आदी सातजणांनी लोकसभेपूर्वी पक्षांतर करून उमेदवारी घेतली आणि विजयीसुद्धा झाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९