शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या तणावातून वर्षभरात सात पोलिसांचा अंत

By admin | Updated: May 22, 2015 00:39 IST

कोल्हापूर पोलीस : काम संपण्याची निश्चित वेळ नसणे, वरिष्ठांकडून अपमानित करणे, आदी कारणे

एकनाथ पाटील - कोल्हापूर -निश्चित नसलेले ड्यूटीचे तास, खाण्यापिण्याच्या अनिश्चित वेळा, कामाचा अतिरिक्त ताण, हक्काची साप्ताहिक सुटीही नाकारली जाणे, घरापासून दूर असलेले पोलीस ठाणे, प्रवासात जाणारा वेळ आणि ठाण्यात गेल्यानंतर केवळ वरिष्ठच नव्हे, तर सामान्य जनतेकडून मिळणाऱ्या वागणुकीने तो खचला जातो. अशा परिस्थितीने वर्षभरात कोल्हापूर पोलीस दलातील सात पोलिसांचा मृत्यू झाल्याची दप्तरी नोंद आहे. वाकोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हत्या आणि पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या या घटनेने राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांच्या आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला. राज्यात गेल्या चार वर्षांत १२९ पोलिसांच्या आत्महत्या झाल्याची गृहखात्याची माहिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी आणि तीन हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर १६०० लोकांच्या मागे एक पोलीस अशी स्थिती आहे. अधिकाऱ्यांच्या ‘मर्जी’तल्या पोलिसांवर मेहेरनजर केली जात असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण कमी असतो आणि इतरांवर बोजा वाढतो. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी तसेच ईद सणानिमित्त बंदोबस्त लावला जातो. त्यामुळे हक्काची साप्ताहिक सुटीही नाकारली जाते. मंत्र्यांचा बंदोबस्त तर पाचवीलाच पूजला आहे. पोलिसांतील नैराश्याची ठिणगी तेथेच पडते. कनिष्ठ स्तरावरील पोलीस या आगीत जळत असतो. अशातच नैराश्य आलेला हा पोलीस त्यातून बाहेरच पडत नाही आणि आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतो. पोलीस म्हणतात...दैनंदिन कामातून वेळ मिळत नसल्यामुळे तसेच अधिक कामाचा ताण असल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य राखणे अवघड असल्याचे काही पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा १२ ते १८ तास ड्यूटी करावी लागते. महत्त्वाचे कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, राजकीय सभा, उत्सव यांमुळे साप्ताहिक सुट्याही रद्द केल्या जातात. बंदोबस्तामध्ये किंवा दैनंदिन कामात जेवणाच्या वेळाही निश्चित नसतात. अनेकदा जेवणच करायला वेळ मिळत नाही. दिवसातील ६० टक्के वेळ ‘आॅन ड्यूटी’मध्ये जात असल्यामुळे पुरेशी झोपही मिळत नाही. अशा परिस्थितीत शारीरिक स्वास्थ्य कसे टिकणार, असा प्रश्नही काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.यांचा झाला मृत्यू पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळ कुलकर्णी, विकास विलास गायकवाड, पिराजी महिपती कुसाळे, शिवाजी रामू कोळी, बळवंत सुबराव शिंदे, सदाशिव भरमाप्पा अंबी. शेतकरी आंदोलनाच्या दंगलीमध्ये गंभीर जखमी होऊन मोहन दिनकर पोवार यांचा मृत्यू. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलिसांची शारीरिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. योग, कार्यशाळा, परेड, ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य कार्यशाळा, आदींचे प्रशिक्षण घेतले जाते.- किसन गवळी, गृह पोलीस उपअधीक्षक