शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रे आता संवर्धन राखीव वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST

संदीप आडनाईक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/कोल्हापूर- कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता संवर्धन राखीव ...

संदीप आडनाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/कोल्हापूर- कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता संवर्धन राखीव वनक्षेत्राचा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजीवांचा प्रामुख्याने वाघांचा कॉरिडॉर कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला ही मंजूरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रांसह सात वनक्षेत्रांचा समावेश आहे. ही माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्लेमेंट यांनी दिली.

सह्याद्रीमधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण

९,३२४ हेक्टरमधील विशाळगड ७,२९१ हेक्टरमधील पन्हाळा, १0,५४८ हेक्टरमधील गगनबावडा, २४, ६६३ हेक्टरमधील आजरा-भुदरगड २२,५२३ हेक्टरमधील चंदगड, सातारा जिल्ह्यातील ६,५११ हेक्टरमधील जोर-जांभळी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ५६९२ हेक्टरमधील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्व्ह चा दर्जा देण्याचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाने राज्य सरकारला पाठवला होता. आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. यामुळे सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. याशिवाय साताऱ्याजवळील ८६६ हेक्टरमधील मायणी पक्षी अभयारण्यालाही या कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा देण्यात आले आहे.

--------------------------

कोट

राखीव वनक्षेत्रांमधील जागा या वन कायद्याअंतर्गत संरक्षित होतात, तर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह मध्ये आरक्षित केलेल्या जागा या वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित होतात. त्यामुळे अशा जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळाले आहे.

- सुहास वायंगणकर,

सदस्य, राज्य वन्य जीव मंडळ.

(संग्रहित छायाचित्र :०४१२२०२०-कोल-तिलारी फॉरेस्ट)