शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अनं शेवंता आजीच्या घरात सात दशकानंतर आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:25 IST

mahavitaran Kolhapur : राधानगरी तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही शिक्षण,आरोग्य, पाणी, विज यासारख्या सेवा सुविधा म्हणाव्या तितक्या पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. या परिसरातील काही खेडेगावांमध्ये साधी विजही पोहोचलेली नाही. धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्येही स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतर वीज आली.

ठळक मुद्देसत्तर वर्षे दिव्याच्या प्रकाशातच संसारविद्यूत क्षेत्र तांत्रिक युनियच्या कर्मचाऱ्यांचा पुढाकार

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  : राधानगरी तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही शिक्षण,आरोग्य, पाणी, विज यासारख्या सेवा सुविधा म्हणाव्या तितक्या पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. या परिसरातील काही खेडेगावांमध्ये साधी विजही पोहोचलेली नाही. धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्येही स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतर वीज आली.

धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्ये अद्यापही विज नव्हती. रॉकेलच्या दिव्याचा उजेड हाच काय तो तिच्या सोबती. विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेस हा प्रसंग दिसला. क्षणाचाही विलंब न लावता एका सामाजिक भावनेतून या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून या महिलेच्या घरात आज वीज कनेक्शन जोडले. त्यामुळे शेवंता आजींच्या घरातील दिव्याचा उजेड आज विजेच्या प्रकाशाने भेदून टाकला.धामोड ( ता. राधानगरी ) येथील शेवंता तुकाराम देसाई या आजीबाई एकट्याच राहतात. घरी अठराविश्व दारिद्र्य . राहायला नीटसे घर नाही, अत्यंत गरिब कुटुंब, पोटभर जेवणासाठी दुसऱ्याच्या घरची धुनीभांडी करून पोटचा उदरनिर्वाह चालवायचा, मग वीज कनेक्शन तरी कुठले किंवा पाणी कनेक्शनचे नाव दुरच . माहिनाभराकाठी मिळणारे जेमतेम एक लिटर रॉकेल पुरवून पुरवून वापरत संध्याकाळी लवकरच जेवण आटोपून दिवा बंद करून झोपी जाणे हा त्यांचा नित्यक्रम. शेवंता आजींच्या वाट्याला आलेले हे 'जीवन ' त्या कसलीही काकू न करता जगत होत्या . याबद्दल कुठलीही तक्रार त्यांनी केली नाही. धामोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सबस्टेशनचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सर्कल संघटक विलास डवर व त्यांचे सहकारी निलेश पोतदार, दत्तात्रय जाधव, अमर फराकटे, युवराज चौगुले, उमेश कांबळे,शेखर जाधव, कपिल चौगुले, यांना लाईट बील वसुली दरम्यान या आजींच्या घरी लाईट नाही ही बाब लक्षात आली.

त्यांनी तात्काळ शाखा अभियंता टंकसाळे यांना ही घटना सांगितली व कनेक्शनसाठी लागणारा खर्च सर्व कर्मचाऱ्यांनी गोळा करत एका सामाजिक भावनेतून अवघ्या दोनच दिवसात या आजीबाईंच्या घरी लाईट जोडून देण्याचे काम केले. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या घरात फक्त दिव्याचा उजेड चमकत होता . त्याची जागा आज लख्ख प्रकशाच्या बल्बने घेतली. त्यामुळे शेवंता आजींच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद पहायला मिळाला . 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर