शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

टोप येथे सात कोटींचा कृत्रिम वाळूचा प्रकल्प : नंदकुमार मिरजकर, आबीद मुश्रीफ यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:48 IST

बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच आम्ही टोप येथे सात कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला असून, एम. एम. ग्रुपच्या राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे

ठळक मुद्देबांधकामासाठी चांगला पर्याय; लवकरच उत्पादन सुरू होणारकोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे

सतीश पाटील ।शिरोली : बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच आम्ही टोप येथे सात कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला असून, एम. एम. ग्रुपच्या राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे उद्योजक नंदकुमार बाळासो मिरजकर व आबीद हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पर्यावरणाचा ºहास होत असल्याने बऱ्याच वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद झाला आहे. त्यामुळे मधल्या काळात बांधकाम व्यवसाय अडचणीत आला होता. अनेक बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर होती. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला होता. मात्र, या समस्येला कृत्रिम वाळूने मोठा आधार पुढे केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसाबंदी आहे. मात्र, वाळू उपलब्ध नसल्यामुळे एकीकडे प्रकल्प उभारणीवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहानसहान व्यावसायिकांना वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून, घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.

मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचला आहे. याला उत्तम पर्याय हा फक्तकृत्रिम वाळूच आहे. शासकीय विभागाकडून करण्यात येणारे घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी भविष्यात शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रीट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूच पर्याय असणार आहे.

या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता वाढते आहे, असे बांधकाम अभियंत्यांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते, तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. ती अधिक मजबुतीने चिकटली जाते. एम. एम. कन्स्ट्रक्शनने टोप येथे प्रशस्त जागेत सुमारे सात कोटी रुपयांचा राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनचा मोठा अत्याधुनिक कृत्रिम वाळूचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पातून लवकरच कृत्रिम वाळू उत्पादन सुरू होणार आहे.एम. एम. ग्रुपचा राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनचा टोप येथे कृत्रिम वाळू व गिलावा वाळू प्रकल्प उभारला असून, जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. नदीच्या वाळूपेक्षा चांगली दर्जेदार वाळू या ठिकाणी तयार होणार आहे. या ठिकाणी बसविलेली अ‍ॅसेम्बल मशिनरी ही गोवा, गुजरात, सातारा, पुणे, नाशिक येथून आणली आहे. गिलावा वाळू आणि काँक्रीट वाळू दोन्ही प्रकल्प यशस्वी उभारलेले आहेत. हे प्रकल्प उभारण्यासाठी पंकज खलीफ व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय