शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

वारणेत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे

By admin | Updated: October 16, 2015 00:48 IST

देवानंद शिंदे यांचे आवाहन : विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्या शिक्षक शिक्षण भूषण पुरस्काराचे वितरण

वारणानगर : वारणेकडे एक प्रचंड इच्छाशक्ती, दृष्टी व संस्कार आहेत. गुणवत्तेच्या जोरावरच प्रगतीचे अनेक टप्पे यशस्वीपणे गाठले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशाला अभिप्रेत राहील, असे ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र’ वारणेने उभे करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे केले.येथील तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल संचलित विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्यावतीने २०१५ गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणेम्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा समूहाचे प्रमुख विनय कोरे होते. तात्यासाहेब कोरे विद्यानगरीतील वारणा शिक्षण संकुलात हा गौरव सोहळा पार पडला.यावेळी दहा शिक्षकांना विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. गौरव प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह जी. डी. पाटील यांनी स्वागत केले. विनय कोरे म्हणाले, वारणेने शिक्षणक्षेत्रात नेहमीच बाजी मारली आहे. आज शिक्षणक्षेत्रात अनेक शिक्षक चांगले काम करतात; परंतु ते पुरस्कारांपासून वंचित राहतात. अशा वंचित गुणीजनांचा वारणेने गौरव केला आहे. यावेळी पद्मश्री तासगावकर, संभाजी लोहार, हरिश्चंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार देण्यात आला. तर जी. डी. पाटील, सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शुभलक्ष्मी कोरे, उपाध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते ‘गुणवंत विद्यार्थी’ पुरस्कार देण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. डी. के. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य जॉन डिसोझा, प्राचार्या हेलिना मोनीस आदी उपस्थित होते. प्रा. राजेंद्र कापरे यांनी आभार मानले. प्रा. प्रीती शिंदे व प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)पुरस्कार विजेते प्रकाश ठाणेकर (पोर्ले तर्फ ठाणे), संजय बजारे (घोटवडे), चंद्रकांत निकाडे (पोहाळे), संभाजी लोहार (माळेवाडी), सुशीला खोत (वालूर), हरिश्चंद्र पाटील (गजापूर), सुभाष गुरव (नरंदे), भीमराव माडगुंडे (किणी), प्रभावती पाटील (कुरळप), जगन्नाथ शेटे (ऐतवडे खुर्द) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी अशा पन्नासपेक्षा जास्त गुणीजनांना पुरस्काराने गौरविण्यात आले.