शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

' बिनविरोध नरेवाडी'साठी चाकरमान्यांची धडपड...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:51 IST

Grampanchyat Elecation Kolhapur- ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख - दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानीमंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नरेवाडीच्या प्रमुख मंडळींनी गेल्या आठवड्यापासून गावात तळ ठोकला आहे, ते केवळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणूनच.

ठळक मुद्दे' बिनविरोध नरेवाडी'साठी चाकरमान्यांची धडपड...! 'कमिटी'ची स्थापना : सुट्टी काढून प्रमुख मंडळींनी गावात ठोकलाय तळ..!

राम मगदूमगडहिंग्लज : ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख - दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानीमंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नरेवाडीच्या प्रमुख मंडळींनी गेल्या आठवड्यापासून गावात तळ ठोकला आहे, ते केवळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणूनच.नरेवाडी..! हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील एक सुशिक्षित व सुसंस्कृत गाव. प्रामुख्याने शिक्षक, पोलीस आणि सैन्यदलात नोकरी करणाऱ्यांची संख्या गावात अधिक आहे. त्यांनीच आता गावच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलला आहे. किंबहुना त्यासाठीच ग्रामपंचायत निवडणूक करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.याकामी विद्यमान सरपंच चंदाबाई निलवे, गुंडू हमाल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कदम, इंजिनीअर दत्ताराम पाटील व सुधीर पाटील, शिक्षक नेते मधुकर येसणे व विनायक पोवार, डॉ. विनय पोवार, सुधाकर पाटील, नारायण पाटील, वसंत पाटील, आनंदा पाटील, आप्पा निलवे, महादेव येसणे, विवेकानंद आस्वले, प्रविण केसरकर, रवींद्र पाटील, धोंडीबा गोविलकर, भास्कर पाटील, आप्पा पाटील, मारुती कांबळे, सुर्यकांत कोकितकर, सिताराम येसणे, सुरेश पाटील, सुनील आस्वले, यांची कमिटी नेमण्यात आली आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस, जनता दल, शिवसेना व भाजपा या प्रमुख पक्षांसह विविध गटांचे सक्रिय कार्यकर्ते गावात आहेत.परंतु, सर्वांनीच 'आम्ही नरेवाडी'करांच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला आहे.तसेच आजी - माजी ग्रामपंचायत सदस्यांसह अजिंक्य क्रीडा मंडळ व सनी स्पोर्ट्स क्लबनेही पाठिंबा दिला आहे. इच्छुकांच्या मुलाखती.!गावाच्या विकासासाठी काय -काय करणार ? यासह विविध प्रश्न विचारून कमिटीने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा 'हेतू' जाणून घेतला. ९ जागांसाठी २४ जणांनी मुलाखती दिल्या.तसेच तरुणाईच्या काय भावना आहेत, हेही जाणून घेण्यात आले.सुमारे ९० महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन कमिटीसमोर आपल्या अपेक्षा मांडल्या. उमेदवारांसाठी निकष !व्यसनमुक्तीसह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न, नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्मशानभूमीसह अन्य प्रलंबित मूलभूत सुविधांचा पाठपुरावा आणि सैन्य व पोलीस भरतीसाठी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा कमिटीचा संकल्प आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनाच संधी देण्याचा त्यांचा विचार आहे.त्यामुळे कमिटीने उमेदवारांसाठी 'खास निकष' तयार केले आहेत.

  •  प्रभाग -३
  • सदस्य संख्या - ९
  • मतदार संख्या - १३९८

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर