शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर विमानतळ सुरक्षेसाठी स्वतंत्र दल?, गृह विभागाकडे प्रस्ताव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 12:51 IST

मंजुरीनंतर सुरक्षा व्यवस्था होणार भक्कम

कोल्हापूर : विमानतळावर २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागते. नियमित पोलिसांना या कामात मर्यादा येतात, त्यामुळे स्वतंत्र विमानतळ सुरक्षा दलाला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गृह विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम होणार आहे.उजळाईवाडी येथील विमानतळावरून सध्या रोज चार ते पाच विमानांचे उड्डाण होते. देशभरातील विमानतळांशी वाढणारा संपर्क आणि प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था भक्कम करणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा पोलिस दलातील ४४ पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४४ कर्मचारी, अशा ८८ कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा व्यवस्थेचा भार आहे. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि तपासणीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते. अन्यथा सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यास विमानतळावर आणि विमान प्रवासात गंभीर धोका उद्भवू शकतो.असे प्रसंग टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वतंत्र विमानतळ सुरक्षा दलाचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे. या दलासाठी १३७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. याला मंजुरी मिळाल्यास सर्व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवून त्यांना प्रशिक्षित केले जाईल, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.कोल्हापूर, सिंधुदुर्ग महत्त्वाची विमानतळेकोल्हापूर आणि सिंधुगुर्ग येथील विमानतळांवरून विमानसेवा सुरू करतानाच त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढत आहे. येणाऱ्या काळात येथून हवाई मालवाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी अधिका-यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या सूचनाविमानतळाची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक पंडित यांनी विमानतळावर कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांसह त्यांच्या साहित्याची तपासणी करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ