शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रतिनियुक्त पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवा, अपर पोलिस महासंचालकांचा आदेश

By उद्धव गोडसे | Updated: July 31, 2024 14:17 IST

अनेकांची अडचण होणार

कोल्हापूर : पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांकडून काही पोलिसांना प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी संलग्न केले जाते. मात्र, सोयीने संलग्नता देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय तरतूद नाही. त्यामुळे बदली झालेल्या पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवावे, असा आदेश अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढला आहे. या आदेशामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, अनेकांना सोयीच्या ठिकाणांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

पोलिस ठाण्यात किंवा परिक्षेत्रातील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांच्या बदल्या होतात. दरवर्षी ही प्रक्रिया सुरू असते. मात्र, बदल्या झाल्यानंतर मर्जीतील काही कर्मचारी आणि अधिका-यांची प्रतिनियुक्तीद्वारे सोय लावली जाते. संबंधित पोलिसांना संलग्न करून घेतले जाते. मात्र, प्रतिनियुक्तीवर संलग्न करून घेण्याची तरतूद कायदेशीर आणि प्रशासकीय नाही.

राज्यात अनेक ठिकाणी शेकडो पोलिस प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचा प्रकार निदर्शनास येताच संबंधित पोलिसांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी पाठवण्याच्या सूचना पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिल्या. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंगळवारी (दि. ३०) एक परिपत्रक जारी केले. त्याद्वारे प्रतिनियुक्तीवर संलग्न असलेले सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश तातडीने सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना पाठवण्यात आला.

पोलिस दलात खळबळ

प्रतिनियुक्ती हा नेहमीच पोलिस दलात कळीचा मुद्दा असतो. मर्जीतील कर्मचा-यांनाच प्रतिनियुक्ती मिळते. अधिका-यांच्या बाबतीतही असेच घडते. मात्र, नव्या आदेशामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार असल्याने अनेकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. तर प्रतिनियुक्ती न मिळालेल्या कर्मचा-यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे चित्र पोलिस दलात दिसत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसTransferबदली