शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

प्रस्ताव पाठवा, कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी देऊ; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 4, 2023 18:50 IST

अंबाबाई, जोतिबा, किल्ल्यांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण

कोल्हापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करून कोल्हापूरचापर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी दिली.पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या अंबाबाई, जोतिबा मंदिरासह महत्त्वाचे किल्ले व पर्यटनस्थळांसाठी ९०० कोटींचा आराखडा पुरातत्त्व विभागाने तयार केला आहे. तसेच पर्यटन विकासासाठी पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, महापालिका यांनी केलेल्या आराखड्यांचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. बैठकीला पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने, वास्तुविशारद कासार पाटील (नाशिक), अंजली कलमदानी(पुणे), आभा लांबा (मुंबई), पूनम ठाकूर (मुंबई), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.मंत्री नाईक म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण आहे. अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पर्यटनस्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा. त्याच्या मंजुरीसाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.मंत्री मुश्रीफ म्हणाले, मंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील असल्यामुळे त्यांचे कोल्हापूरशी घट्ट नाते आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ते निश्चित निधी देतील. निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. या निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. जोतिबा डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप वेचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करा. किल्ल्यांचा विकास आराखडा करताना आजूबाजूच्या परिसराचाही विकास होईल, याकडे लक्ष द्या. पन्हाळा ते विशाळगडदरम्यान ट्रेकिंग मार्गावर सोयीसुविधा व दिशादर्शक फलक लावा.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन राज्य शासनाला पाठविण्यात येत असलेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी १३.५२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

यांचा होणार विकास..अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या-त्या विभागप्रमुखांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन