शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देशिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका परिवर्तनात आंबेडकरी जनतेचा मोठा सहभाग

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी देशात निश्चित परिवर्तन करेल, यामध्ये आंबेडकरी जनतेचा मोठा सहभाग असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रा. कवाडे पक्षाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा. कवाडे म्हणाले, सरकारमध्ये रहायचे आणि सरकारलाच शिव्या घालण्याचा उद्योग शिवसेनेने केला. काल-परवा पर्यंत स्वबळाचा नारा देत मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहे, म्हणणारे ठाकरे चोरांच्या टोळीत सामील झाले कसे? याचे उत्तर महाराष्ट्राच्या  जनतेला द्यावे लागेल.

समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या कारभाराने त्रस्त आहे. यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर होते, तेथून १२ किलो मीटर शहीद जवानाचे कुटूंब रहात होते. तिथे जाऊन कुटूंबाचे सात्वन करावे, असे त्यांना वाटले नाही. यावरून भाजप सरकार संवेदीनहीन आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत केंद्र सरकारच्या आडून देशात आपला अजेंडा राबवत आहेत. देशाची वाटचाल अराजकतकडे सुरू असून कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी परिवर्तन करून देश वाचवेल, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेkolhapurकोल्हापूर