शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सेना-भाजपमध्ये युती होणार, भांडण लुटूपुटूचे, विनायक मेटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:04 IST

आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना -भाजपमध्ये युती होणारच आहे, सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत केली. शिवसंग्राम भाजपसोबतच निवडणूक लढवणार आहे. जागा वाटपाची अनौपचारीक चर्चा झाली असून ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात चित्र स्पष्ट होणार आहे, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा भाजपसोबतच लढणार९ फेब्रुवारीला औरंगाबादला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा

कोल्हापूर: आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना -भाजपमध्ये युती होणारच आहे, सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत केली. शिवसंग्राम भाजपसोबतच निवडणूक लढवणार आहे. जागा वाटपाची अनौपचारीक चर्चा झाली असून ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात चित्र स्पष्ट होणार आहे, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.खासगी कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या आमदार मेटे यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मेटे म्हणाले, २0१४ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत शिवसंग्राम हा सामाजिक पक्ष होता, त्यानंतर तो राजकीय झाला आहे. पक्षाकडे एक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत सदस्य अशी सत्तास्थाने आहेत. आगामी निवडणूकही लढवणार आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत जागावाटपासंदर्भात अनौपचारीक चर्चा झाली आहे.

लोकसभेची एक आणि उर्वरीत विधानसभेच्या जागासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे. भाजपनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला पक्षातर्फे औरंगाबादमध्ये निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार रामदास आठवले, शिवसेना आमदार चंद्रकांत खैरे हे उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यात शेतकरी व शेतमजूर यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी म्हणून राज्यभरातील ५ लाख शेतकºयांकडून भरुन घेतलेले अर्ज सादर करुन पेन्शनची मागणी केली जाणार आहे. याशिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी द्यावी, व्यवसायासाठी भांडवल द्यावे अन्यथा दरमहा पाच हजारप्रमाणे भत्ता द्यावा अशा मागणीचा ठराव केला जाणार आहे.बुलढाणा जिल्ह्याला राजमाता जिजाउंचे नाव द्याबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे राजमाता जिजाउ यांचे जन्मगाव आहे. स्वराज्य उभारणाºया शिवाजी महाराजांच्या मातोश्री नाव बुलढाण्याला द्यावे यासाठी शिवसंग्राम आग्रही राहणार आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही, असेही मेटे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेkolhapurकोल्हापूर