शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हागणदारीमुक्त शहरची स्वयंघोषणा अनुदानासाठी!

By admin | Updated: February 15, 2017 00:41 IST

इचलकरंजी नगरपालिका : प्रांत कार्यालयाभोवतीच हागणदारीचे साम्राज्य

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने उद्या, गुरुवारी बोलविलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये इचलकरंजी शहर हे हागणदारीमुक्त झाल्याची स्वयंघोषणा करण्याबाबत ठराव करणे व केलेला ठराव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविणे, असा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयास मंजुरी दिल्यास नगरपालिकेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. मात्र, शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त न होताच हा विषय घेतल्याचे समजताच सोशल मीडियासह नागरिकांतून याबाबत नगरपालिकेच्या कारभाराची खिल्ली उडवली जात आहे.नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून दोन कोटी ८५ लाखांचे अनुदान २४७६ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यातून आतापर्यंत १६०० लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. मात्र, उर्वरित तब्बल ८७६ कुटुंबीयांनी अद्याप शौचालये बांधली नाहीत, हे स्पष्ट होते. तसेच शहरातील दोन तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या प्रांत कार्यालय भोवतालच्या परिसरात राजरोसपणे उघड्यावर शौचास बसत आहेत. यासह शहरातील टाकवडे वेस रोड, निरामय दवाखाना परिसर, कलानगर तीन बत्ती परिसर अशा अनेक प्रमुख भागांत सर्रास उघड्यावर शौचास बसण्याचे सुरूच आहे. त्यामुळे अनुदानाच्या हव्यासापोटी शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर न करताच ठराव कसा काय केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिलेल्या भेटीवेळीही शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत, तसेच शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले होते. नगरपालिकेने शहर, लोकसंख्या व राहणीमान या आधारावर आवश्यक टक्केवारी पार झाल्याचा तांत्रिक मुद्दा पुढे करून अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कागदोपत्री पूर्ततेनंतर यश मिळेलही. मात्र, साक्षात शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर होणार कधी, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)मुख्याधिकाऱ्यांची डोळे झाकून सहीउद्या, गुरुवारी या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांच्या शेवटी नेहमीप्रमाणे शेवटचा विषय ऐनवेळच्या विषयांचा आहे. त्यामध्ये ऐनवेळेच्या विषयांमध्ये पाचपेक्षा जादा विषय, तसेच आर्थिक व धोरणात्मक निर्णय होण्यास हरकत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नियमानुसार त्याठिकाणी मान्य करता येणार नाहीत, असे नमूद करणे आवश्यक होते. हे न पाहताच मुख्याधिकाऱ्यांनी डोळे झाकून सही केली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.