शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

हागणदारीमुक्त शहरची स्वयंघोषणा अनुदानासाठी!

By admin | Updated: February 15, 2017 00:41 IST

इचलकरंजी नगरपालिका : प्रांत कार्यालयाभोवतीच हागणदारीचे साम्राज्य

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने उद्या, गुरुवारी बोलविलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये इचलकरंजी शहर हे हागणदारीमुक्त झाल्याची स्वयंघोषणा करण्याबाबत ठराव करणे व केलेला ठराव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविणे, असा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयास मंजुरी दिल्यास नगरपालिकेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. मात्र, शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त न होताच हा विषय घेतल्याचे समजताच सोशल मीडियासह नागरिकांतून याबाबत नगरपालिकेच्या कारभाराची खिल्ली उडवली जात आहे.नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून दोन कोटी ८५ लाखांचे अनुदान २४७६ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यातून आतापर्यंत १६०० लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. मात्र, उर्वरित तब्बल ८७६ कुटुंबीयांनी अद्याप शौचालये बांधली नाहीत, हे स्पष्ट होते. तसेच शहरातील दोन तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या प्रांत कार्यालय भोवतालच्या परिसरात राजरोसपणे उघड्यावर शौचास बसत आहेत. यासह शहरातील टाकवडे वेस रोड, निरामय दवाखाना परिसर, कलानगर तीन बत्ती परिसर अशा अनेक प्रमुख भागांत सर्रास उघड्यावर शौचास बसण्याचे सुरूच आहे. त्यामुळे अनुदानाच्या हव्यासापोटी शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर न करताच ठराव कसा काय केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिलेल्या भेटीवेळीही शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबत, तसेच शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले होते. नगरपालिकेने शहर, लोकसंख्या व राहणीमान या आधारावर आवश्यक टक्केवारी पार झाल्याचा तांत्रिक मुद्दा पुढे करून अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कागदोपत्री पूर्ततेनंतर यश मिळेलही. मात्र, साक्षात शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर होणार कधी, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)मुख्याधिकाऱ्यांची डोळे झाकून सहीउद्या, गुरुवारी या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांच्या शेवटी नेहमीप्रमाणे शेवटचा विषय ऐनवेळच्या विषयांचा आहे. त्यामध्ये ऐनवेळेच्या विषयांमध्ये पाचपेक्षा जादा विषय, तसेच आर्थिक व धोरणात्मक निर्णय होण्यास हरकत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नियमानुसार त्याठिकाणी मान्य करता येणार नाहीत, असे नमूद करणे आवश्यक होते. हे न पाहताच मुख्याधिकाऱ्यांनी डोळे झाकून सही केली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.