कोल्हापूर : येथील केआयटीच्या अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयामधील बायोटेक्नोलॉजी विभागाच्या प्रतीक पाटील आणि संदीप बेर्गल या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीमध्ये निवड झाली आहे. ते कोरोना लसीचे उत्पादन विभागामध्ये रुजू झाले असल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजीद हुदली आणि सचिव दीपक चौगुले यांनी शनिवारी दिली.
सध्याच्या कोरोना काळात बायोटेक सेक्टरमधील संशोधनाचे महत्त्व कोरोना लसीमुळे सर्व जगासमोर आले आहे. त्यानिमित्ताने बायोटेकमधील कामाचे स्वरूप आणि कंपन्या सर्व जगासमोर आल्या. बऱ्याच फार्मास्युटिकल कंपन्या कोरोना लसीचे उत्पादन करण्यातही पुढे आल्या आहेत. अशा विविध कंपन्यांमध्ये बायोटेकनॉलॉजी इंजिनिअर्सची गरज असते. त्यामध्ये सध्या कोविशिल्ड लसीमुळे चर्चेत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीत केआयटीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड होणे अभिमानास्पद असल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. या प्लेसमेंटस्चे काम ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. ऋतुपर्ण करकरे यांनी केले. त्यांना केआयटीचे डीन डॉ. अमित सरकार, बायोटेक विभागप्रमुख डॉ. पल्लवी पाटील, केआयटीचे प्रभारी संचालक डॉ. मनोज मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२६०९२०२१-कोल-प्रतीक पाटील (केआयटी), संदीप बेर्गल (केआयटी)