शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

फाइव्ह स्टार व्हिलेज उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 10:22 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देफाइव्ह स्टार व्हिलेज उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवडकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याहस्तें व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल या पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशन योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतुने फाई स्टार व्हिलेज कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. 

यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु. व वेसर्डे, हातकणंगले तालुक्यातील दानोळी, गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी, कागल तालुक्यातील कौलगे या  पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे हे निवड झालेल्या गावांपैकी भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु या गावात दि. १० सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजता या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून पोस्ट ऑफीस अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.या योजनेत गावातील प्रत्येक घरात पोस्टाच्या पाच योजना पोहोचवण्यात येणार आहेत यामध्ये सेव्हिंग बँकेच्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयपीपीबी खाते , टपाल जीवन विमा , प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना व जीवन सुरक्षा योजना यांचा समावेश आहे.जनधन खाते गॅस सबसिडी , शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला , विद्यार्थ्यांना मिळावेत. पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत, आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर पाच गावामध्ये राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातून ५० गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसkolhapurकोल्हापूर