शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

११ साखर कारखान्यांची ८० लाख बँक हमी जप्त

By admin | Updated: March 7, 2015 01:01 IST

सोमवारी मुंबईत सुनावणी : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

 कोल्हापूर : नदी व तत्सम पाण्याचे स्त्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा आणि सांगली जिल्ह्यातील एक अशा अकरा साखर कारखान्यांची ८० लाख रुपयांची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली. त्यांना ‘उत्पादन का बंद करू नये, अशा नोटिसा दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे अलीकडच्या काळात एकाचवेळी झालेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. बड्या राजकीय नेत्यांचे हितसंबंध असलेल्या कारखान्यांवर कारवाई झाल्याने सहकारक्षेत्रात खळबळ उडाली. या कारवाईची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी शुक्रवारी पत्रकारांना भीत भीत दिली. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जाणीव जागृती व त्वरितच्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यांपूर्वी उपसमितीची स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. दीड महिन्यांपूर्वी उपसमितीने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची पाहणी केली. त्यावेळी आप्पासाहेब नलवडे आणि ‘वारणा’ वगळता अन्य सर्व साखर कारखाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. ‘ओरिएंटल’प्रकल्प हवा प्रदूषण करत असल्याचे समोर आले. सांडपाणी प्रकल्पातील त्रुटी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न करून घेणे, अटी व नियमांचे उल्लंघन करणे आदी दोष आढळून आले. कुंभी-कासारी, राजाराम, जवाहर, वारणा या कारखान्यांनी साखर उत्पादन युनिटमधून प्रदूषण केले आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच लाखांची बँक हमी जप्त करण्यात आली. उर्वरित साखर कारखान्यांनी साखर उत्पादन, डिस्टिलरी या दोन्ही उत्पादन युनिटमधून प्रदूषण केले आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा लाखांची बँक हमी जप्त केली आहे. जलप्रदूषण नियंत्रण कायदा ७४ व हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ अन्वये ही कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. बँकेकडून कारवाईची माहिती मुख्य कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कारखान्यांनी ज्या बँकेत हमी दिली होती, त्या बँकेची हमी जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कारखान्यांना कारवाईची माहिती कळाली. आधी जप्तीची कारवाई आणि नंतर माहिती, असे सूत्र अवलंबिल्यामुळे दबाव टाकूनही कारवाईतून सुटका करून घेणे शक्य झाले नाही. हे आहेत कारखाने दत्त (शिरोळ), पंचगंगा - रेणुका (गंगानगर, इचलकरंजी), जवाहर (हुपरी), दालमिया (आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा), भोगावती (परिते, ता.करवीर), कुंभी- कासारी (कुडित्रे, करवीर),आप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), तात्यासाहेब कोरे वारणा (वारणानगर), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), डी. वाय. पाटील (गगनबावडा), राजारामबापू (साखराळे, जि. सांगली) असे कारवाई झालेल्या साखर कारखान्यांची नावे आहेत. ओरिएंटल ग्रीन पॉवर कंपनी (गगनबावडा) सहवीज निर्मिती प्रकल्पाचाही समावेश. (प्रतिनिधी)