शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना हरवलं अन् तिथेच आवाडेंचं ठरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:02 IST

लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते.

ठळक मुद्देधैर्यशील यांच्या विजयात आवाडे यांच्या बंडाची बीजेराहुल आवाडेंचा दबाव : लोकसभेपासूनच सुरू होत्या हालचाली

विश्र्वास पाटील कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद सदस्य असलेला त्यांचा मुलगा राहुल यांचाच दबाव जास्त होता. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे पुढे आले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने हे विजयी झाल्यापासूनच आवाडे गटात जास्त अस्वस्थता होती. त्याचीच परिणती पक्ष सोडण्यात झाली आहे. आवाडे गटाच्या राजकारणात राहुल यांचा शब्द आता कोण डावलू शकत नाही, हेच त्यामागील खरे कारण आहे.लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते. त्यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून धैर्यशील माने, निवेदिता माने, आदी विविध नावांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी राहुल आवाडे यांचा शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न होता.

मी शिवसेनेत जाऊन शेट्टी यांच्याविरोधात लढतो, असा त्यांचा कुटुंबातही टोकाचा आग्रह होता. त्यांनी शेट्टी यांच्याविरोधात त्यावेळी अर्जही दाखल केला होता. त्यावेळी त्यांचा अर्ज माघार घेताना आवाडे कुटुंबीयांना नाकीनऊ आले होते; परंतु त्याच्या काही दिवसच आधी प्रकाश आवाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती आणि आवाडे घराण्याचे काँग्रेसशी इतक्या वर्षांचे संबंध आहेत. शिवाय त्यांचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शेट्टी यांच्याशीही चांगले संबंध तयार झाले होते. त्यामुळे कुटुंबातूनच राहुल यांना पाठबळ मिळाले नाही.

पुढच्या राजकारणात धैर्यशील माने यांना ही संधी मिळाली व ते लाटेवर स्वार होऊन खासदार बनले. त्यानंतर मात्र राहुल यांची चिडचिड जास्त वाढली. ‘तुमच्यामुळेच माझा खासदारकीचा हातातोंडाचा घास गेला,’ असे राहुल यांचे म्हणणे होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा वडिलांवर काँग्रेस सोडण्याचा दबाव होता. तो लोकसभेला नाही, परंतु किमान विधानसभेच्या अगोदर तरी यशस्वी झाला.आवाडे नकोत की हात?राहुल यांनीच गेल्या महिन्यात इचलकरंजीत तीन टीम नेमून घरोघरी सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये ‘आम्हांला आवाडे हवेत; परंतु तुमचे हात चिन्ह नको अशी बहुतांश लोकांनी सांगितल्याचे आवाडे यांचे म्हणणे होते.

नव्या पिढीला हात चिन्हावर मते द्यायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हे चिन्ह घेऊ नका, असा निर्णय झाला. चिन्ह घ्यायचे नाही तर पक्षात राहून अपक्ष म्हणून लढता येणार नाही म्हणून त्यांनी शेवटी काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीला आवाडे नकोत की हात नको याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर