शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

किसान मुक्ती यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरवात; मोदींचा पराभव करण्याची ताकद फक्त शेतक-यांतच - राजू शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 02:20 IST

या देशातील शेतकरी हा एकच घटक असा आहे की, त्याने ठरविले तर २०१९ च्या निवडणुकीत तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करू शकतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी तेलंगण राज्यातील खम्मम जिल्ह्यात केले.

कोल्हापूर : या देशातील शेतकरी हा एकच घटक असा आहे की, त्याने ठरविले तर २०१९ च्या निवडणुकीत तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करू शकतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी तेलंगण राज्यातील खम्मम जिल्ह्यात केले.राष्ट्रीय किसान मुक्ती यात्रेच्या दुस-या टप्प्यास तेलंगण राज्याच्या विधानभवनापासून सुरुवात झाली असून, ही यात्रा तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात पोहोचली आहे. या किसान यात्रेचे येथील शेतक-यांनी जोरदार स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, ‘देशातील शेतक-यांना अच्छे दिन आणून स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिले होते.मात्र, त्या आश्वासनाचा नरेंद्र मोदी यांना विसर पडला असून, सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे देशातील शेतक-याला संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. त्यासाठीच ही यात्रा काढण्यात येत असून केंद्रातील भाजप सरकारला या प्रश्नांवर आम्ही नक्कीच गुडघे टेकायला लावू.’किसान मुक्ती यात्रा खम्मम जिल्ह्यामधे पोहोचली तेव्हा स्टेडियममध्ये हजारो शेतकरी जमले होते.यावेळी व्ही. एम. सिंह (उत्तर प्रदेश), योगेंद्र यादव (हरियाणा), डॉक्टर सुनीलम्म (मध्य प्रदेश), कविता (कर्नाटक), चंद्रशेखर रेड्डी (तेलंगणा), आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी