शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:55 IST

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ...

ठळक मुद्दे‘उत्सव’चे उत्साहात प्रकाशन; वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न : सोनाली नवांगुळ

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले.

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या ‘उत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयातील या कार्यक्रमास गोपाळकृष्ण गोखले कॉलेजच्या प्रशासनाधिकारी डॉ. मंजिरी मोरे-देसाई, लेखिका डॉ. सोनाली नवांगुळ प्रमुख उपस्थित होत्या.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘लोकमत’समवेत माझे एक वेगळे नाते आहे; त्यामुळे या दिवाळी अंकांचे प्रकाशन माझ्या हस्ते झाल्याने वेगळा सन्मान मला लाभला. प्रत्येकात एक वाचक असतो. ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या अंकांनी असे वाचक शोधण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागात विज्ञानवादी विचार, संकल्पना आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत आहे. त्याला ‘लोकमत’ने प्रोत्साहन द्यावे.

लेखिका नवांगुळ म्हणाल्या, ‘लोकमत’चे दिवाळी अंक म्हणजे समाज परिवर्तन कसे होत आहे, ते पाहण्याचा टीपकागद आहे. जितका खर्च झाला, त्यापेक्षा अधिक रिझल्ट मिळालाच पाहिजे, अशी वृत्ती वाढत असताना वाचनसंस्कृती वाढविण्याचा एक वेगळा विचार घेऊन ‘लोकमत’ वाटचाल करत आहे.डॉ. मंजिरी मोरे-देसाई म्हणाल्या, ‘वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे काम या दिवाळी अंकांमधून होत आहे. ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक नव्हे, तर पीएच.डी. संशोधनाचा शोधनिबंध आहे. आज बोटावर मोजण्याइतके प्राध्यापक लेखन करतात. कॉलेजमधील बहुतांश विद्यार्थी वाचनापासून दूर गेले आहेत. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राज्यपातळीवर ‘दीपोत्सव’ आणि स्थानिक पातळीवर ‘उत्सव’ हा दिवाळी अंक ‘लोकमत’ प्रकाशित करते. संपादन ते मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा, मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचे दार उघडणारा असा ‘दीपोत्सव’ हा अंक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील स्थानिक लेखकांना ‘उत्सव’ या अंकामध्ये संधी दिली जाते. या अंकांच्या माध्यमातून लेखक आणि ‘लोकमत’ यांच्यात भावबंध निर्माण झाले आहेत.’या कार्यक्रमास ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक (वितरण-साऊथ महाराष्ट्र) संजय पाटील, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, वितरण व्यवस्थापक ओंकार कोठावळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर उपस्थित होते.लेखकांचा सन्मानलेखकांना कष्ट करायला लावून त्यांचे विचार दिवाळी अंकांतून समाजापर्यंत ‘लोकमत’ पोहोचवीत आहे. केवळ लेखनावर अवलंबून असणाऱ्यांना ‘लोकमत’ हे सन्मान आणि बळ देते, असे लेखिका नवांगुळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर