शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:55 IST

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ...

ठळक मुद्दे‘उत्सव’चे उत्साहात प्रकाशन; वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न : सोनाली नवांगुळ

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले.

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या ‘उत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयातील या कार्यक्रमास गोपाळकृष्ण गोखले कॉलेजच्या प्रशासनाधिकारी डॉ. मंजिरी मोरे-देसाई, लेखिका डॉ. सोनाली नवांगुळ प्रमुख उपस्थित होत्या.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘लोकमत’समवेत माझे एक वेगळे नाते आहे; त्यामुळे या दिवाळी अंकांचे प्रकाशन माझ्या हस्ते झाल्याने वेगळा सन्मान मला लाभला. प्रत्येकात एक वाचक असतो. ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या अंकांनी असे वाचक शोधण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागात विज्ञानवादी विचार, संकल्पना आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत आहे. त्याला ‘लोकमत’ने प्रोत्साहन द्यावे.

लेखिका नवांगुळ म्हणाल्या, ‘लोकमत’चे दिवाळी अंक म्हणजे समाज परिवर्तन कसे होत आहे, ते पाहण्याचा टीपकागद आहे. जितका खर्च झाला, त्यापेक्षा अधिक रिझल्ट मिळालाच पाहिजे, अशी वृत्ती वाढत असताना वाचनसंस्कृती वाढविण्याचा एक वेगळा विचार घेऊन ‘लोकमत’ वाटचाल करत आहे.डॉ. मंजिरी मोरे-देसाई म्हणाल्या, ‘वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे काम या दिवाळी अंकांमधून होत आहे. ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक नव्हे, तर पीएच.डी. संशोधनाचा शोधनिबंध आहे. आज बोटावर मोजण्याइतके प्राध्यापक लेखन करतात. कॉलेजमधील बहुतांश विद्यार्थी वाचनापासून दूर गेले आहेत. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राज्यपातळीवर ‘दीपोत्सव’ आणि स्थानिक पातळीवर ‘उत्सव’ हा दिवाळी अंक ‘लोकमत’ प्रकाशित करते. संपादन ते मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा, मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचे दार उघडणारा असा ‘दीपोत्सव’ हा अंक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील स्थानिक लेखकांना ‘उत्सव’ या अंकामध्ये संधी दिली जाते. या अंकांच्या माध्यमातून लेखक आणि ‘लोकमत’ यांच्यात भावबंध निर्माण झाले आहेत.’या कार्यक्रमास ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक (वितरण-साऊथ महाराष्ट्र) संजय पाटील, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, वितरण व्यवस्थापक ओंकार कोठावळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर उपस्थित होते.लेखकांचा सन्मानलेखकांना कष्ट करायला लावून त्यांचे विचार दिवाळी अंकांतून समाजापर्यंत ‘लोकमत’ पोहोचवीत आहे. केवळ लेखनावर अवलंबून असणाऱ्यांना ‘लोकमत’ हे सन्मान आणि बळ देते, असे लेखिका नवांगुळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर