शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भामट्यांच्या शोधासाठी आंध्र प्रदेशला पथक रवाना

By admin | Updated: August 25, 2015 00:25 IST

एसएमएसद्वारे फसवणूक प्रकरण : दिवसभर गुंतवणूकदारांची पोलीस ठाण्यात वर्दळ

कोल्हापूर : मोबाईल एसएमएसद्वारे कंपन्यांची आॅनलाईन जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या शोधासाठी सोमवारी आंध्र प्रदेशला पथक रवाना झाले. संशयित आरोपी संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे (सर्व रा. सेंट मेरी रोड, पेराम्बूर, चेन्नई) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून त्यांचे वास्तव आंध्र प्रदेशमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, गुंतविलेल्या पैशांचे पुरावे सादर करण्यासाठी सोमवारी दिवसभर गुंतवणूकदारांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्दळ सुरू होती. गुंतवणूकदारांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त असल्याने याठिकाणी तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे या चौघांनी तीन महिन्यांपूर्वी न्यू शाहूपुरी परिसरातील शारदा चेंबर्समध्ये ‘व्हीजन मीडिया आयटी सोल्युशन फर्म’ नावाने कंपनी सुरू केली होती. जगभरातील १९ कंपन्यांचे आॅनलाईन जाहिरातीचे टेंडर घेतल्याचे सांगून त्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील गुंतवणूकदारांना १५ दिवसांत दामदुप्पट पैसे मिळविण्याची भुरळ घालून त्यांच्याकडून एसएमएसच्या नावाखाली पैसे गोळा करून शनिवारी रात्री कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार बाबासाहेब नारायण निवळे (वय ३५, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) यांनी आपली पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी या चौघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी फसवणूक झालेल्या शंभरपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी पैसे जमा केलेल्या पावत्या पोलिसांकडे जमा केल्या. यावेळी पाच हजारपासून २५ लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये काही एजन्सीधारकांचा समावेश आहे. फसवणूक प्रकरणात महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आॅनलाईन एसएमएस पाठवण्याचे काम कोणत्याही नेट कॅफेमधून करता येत असल्याने अनेकांनी त्यामध्ये पैसे गुंतविले. सुरुवातीस तीन ते चार हप्त्यांमध्ये दामदुप्पट पैसे मिळू लागल्याने पैशाच्या हव्यासापोटी गुंतवणूक केल्याचे तक्रारदारांनी सांगितले.