शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कारखान्यांची धुराडी थंडावली

By admin | Updated: March 3, 2017 23:42 IST

उताऱ्यात अर्धा टक्क्याने घट : साखर उताऱ्यात सहकारीपेक्षा खासगी कारखान्यांची आघाडी

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागात उसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने यावर्षी २०१६-१७चा हंगाम फेब्रुवारी महिन्यातच गुंडाळला आहे. मागील वर्षी (२०१५-१६)च्या हंगामपेक्षा तब्बल ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कमी झाले आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याने साखर उत्पादनही एक कोटी एक लाख ५१ हजार ३१५ क्विंटलने कमी झाले. साखर उताऱ्यात सहकारी पेक्षा खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१६ मध्ये एप्रिल, मे मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीने शेतीसाठीच्या पाणी उपशावर बंदी घालण्यात आली. यामुळे उसाची उभी पिके करपली होती. त्यातच संभाव्य पाणीटंचाई ओळखून शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीला फाटा दिला होता. याचा परिणाम १० ते १५ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील कमी झाले होते, तर जून-जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसाने ऊसपीक वाढीला खो बसला होता. याचा एकत्रित परिणाम साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर झाला आहे. कोल्हापूर विभागातील एक-दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात गुंडाळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ, शाहू कागल, तर सांगली जिल्ह्यातील रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ हे तीन कारखाने सुरू असले तरी येत्या चार दिवसांत हे कारखानेही बंद होणार आहेत. यावर्षी कोल्हापूर विभागातील ४१ साखर कारखान्यांपैकी ३६ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, सांगली जिल्ह्यातील एक पूर्णत: बंद राहिले व दोन कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले तरी उसाअभावी बंद पडले. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास २३ कारखान्यांपैकी २१ कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण केले असून, १ कोटी २ लाख ३ हजार ४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.९९ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी २० लाख २१ हजार ८६७ मेट्रिक टन उसाचे साखर उत्पादन केले आहे. जवाहर, हुपरी कारखान्याने कोल्हापूर विभागात सर्वांत जास्त १३ लाख ८६ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे, तर वारणा १३ लाख २८ हजार ७२० मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय व दत्त शिरोळ ८ लाख ३५ हजार २४५ मे. टन उसाचे गाळप करून तिसऱ्या स्थानावर आहे. साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळीने १३.०० टक्के सरासरी उतारा मिळवून प्रथम, तर कुंभी-कासारी, कुडित्रेने १२.८० उतारा मिळवीत दुसरा व बिद्री १२.६७ टक्के उतारा मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी घट झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळप झाले आहे. सांगली जिल्ह्यातही अशी परिस्थिती असून, अठरा साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनीच आपले गाळप हंगाम पूर्ण केले आहेत. एक बंद, तर दोन साखर कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम सुरू करून बंद केले आहेत. सांगली जिल्ह्यात ४९ लाख ५३ हजार ८८९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, मागील वर्षीपेक्षा ३० लाख ३२ हजार ५८९ मेट्रिक टन ऊस गाळप कमी झाले आहे. सर्वाेदय रा. बा. पाटील युनिट-३ कारखान्याने साखर उतारा १२.७५टक्के मिळवीत चांगली कामगिरी केली आहे. ऊस गाळपात ‘जवाहर’, हुपरी, तर सरासरी साखर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ टाकळीची आघाडीकोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळपकोल्हापूर जिल्हा एकूण साखर कारखाने २३हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७२१०२१ कोटी २३ हजार ४४१ कोटी २० लाख २१ हजार ८६७११.९९२०१५-१६२१०२१ कोटी ४६ लाख ३१ हजार ५९३१ कोटी ८४ लाख ७३ हजार ५१२.६०सांगली जिल्हा एकूण साखर कारखाने १८हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७१५०३४९ लाख ५३ हजार ८८९५९ लाख ३३ हजार ४६३११.९८२०१५-१६१७०१७९ लाख ८६ हजार ४७८९६ लाख ३३ हजार ६४०१२.०६