शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

कारखान्यांची धुराडी थंडावली

By admin | Updated: March 3, 2017 23:42 IST

उताऱ्यात अर्धा टक्क्याने घट : साखर उताऱ्यात सहकारीपेक्षा खासगी कारखान्यांची आघाडी

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागात उसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने यावर्षी २०१६-१७चा हंगाम फेब्रुवारी महिन्यातच गुंडाळला आहे. मागील वर्षी (२०१५-१६)च्या हंगामपेक्षा तब्बल ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कमी झाले आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याने साखर उत्पादनही एक कोटी एक लाख ५१ हजार ३१५ क्विंटलने कमी झाले. साखर उताऱ्यात सहकारी पेक्षा खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१६ मध्ये एप्रिल, मे मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीने शेतीसाठीच्या पाणी उपशावर बंदी घालण्यात आली. यामुळे उसाची उभी पिके करपली होती. त्यातच संभाव्य पाणीटंचाई ओळखून शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीला फाटा दिला होता. याचा परिणाम १० ते १५ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील कमी झाले होते, तर जून-जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसाने ऊसपीक वाढीला खो बसला होता. याचा एकत्रित परिणाम साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर झाला आहे. कोल्हापूर विभागातील एक-दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात गुंडाळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ, शाहू कागल, तर सांगली जिल्ह्यातील रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ हे तीन कारखाने सुरू असले तरी येत्या चार दिवसांत हे कारखानेही बंद होणार आहेत. यावर्षी कोल्हापूर विभागातील ४१ साखर कारखान्यांपैकी ३६ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, सांगली जिल्ह्यातील एक पूर्णत: बंद राहिले व दोन कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले तरी उसाअभावी बंद पडले. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास २३ कारखान्यांपैकी २१ कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण केले असून, १ कोटी २ लाख ३ हजार ४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.९९ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी २० लाख २१ हजार ८६७ मेट्रिक टन उसाचे साखर उत्पादन केले आहे. जवाहर, हुपरी कारखान्याने कोल्हापूर विभागात सर्वांत जास्त १३ लाख ८६ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे, तर वारणा १३ लाख २८ हजार ७२० मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय व दत्त शिरोळ ८ लाख ३५ हजार २४५ मे. टन उसाचे गाळप करून तिसऱ्या स्थानावर आहे. साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळीने १३.०० टक्के सरासरी उतारा मिळवून प्रथम, तर कुंभी-कासारी, कुडित्रेने १२.८० उतारा मिळवीत दुसरा व बिद्री १२.६७ टक्के उतारा मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी घट झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळप झाले आहे. सांगली जिल्ह्यातही अशी परिस्थिती असून, अठरा साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनीच आपले गाळप हंगाम पूर्ण केले आहेत. एक बंद, तर दोन साखर कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम सुरू करून बंद केले आहेत. सांगली जिल्ह्यात ४९ लाख ५३ हजार ८८९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, मागील वर्षीपेक्षा ३० लाख ३२ हजार ५८९ मेट्रिक टन ऊस गाळप कमी झाले आहे. सर्वाेदय रा. बा. पाटील युनिट-३ कारखान्याने साखर उतारा १२.७५टक्के मिळवीत चांगली कामगिरी केली आहे. ऊस गाळपात ‘जवाहर’, हुपरी, तर सरासरी साखर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ टाकळीची आघाडीकोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळपकोल्हापूर जिल्हा एकूण साखर कारखाने २३हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७२१०२१ कोटी २३ हजार ४४१ कोटी २० लाख २१ हजार ८६७११.९९२०१५-१६२१०२१ कोटी ४६ लाख ३१ हजार ५९३१ कोटी ८४ लाख ७३ हजार ५१२.६०सांगली जिल्हा एकूण साखर कारखाने १८हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा२०१६-१७१५०३४९ लाख ५३ हजार ८८९५९ लाख ३३ हजार ४६३११.९८२०१५-१६१७०१७९ लाख ८६ हजार ४७८९६ लाख ३३ हजार ६४०१२.०६