शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धवट प्रकल्पांची होणार छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:18 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : पर्यटन , क्रीडा, सांस्कृतिक विभागासह अन्य विभागांच्या अर्धवट राहिलेल्या विशेष प्रकल्पांची माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ...

समीर देशपांडेकोल्हापूर : पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक विभागासह अन्य विभागांच्या अर्धवट राहिलेल्या विशेष प्रकल्पांची माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिल्या आहेत. शासनाचा पैसा गुंतून पडला आहे; परंतु ज्या वास्तू पूर्ण झाल्या नाहीत अशा इमारतींचाही यामध्ये समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि नगरविकासचे प्रशासन अधिकारी हेमंत निकम यांना त्यांनी याबाबत सूचना दिल्या.

रेखावार यांच्या पुढाकाराने गेल्या दोन महिन्यांत पर्यटनविषयक अनेक उपक्रम राबविण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यानंतर नेमके काय काम सुरू आहे, याकरिता प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. यावेळी उदाहरणासह काही माहिती दिल्यानंतर त्यांनी अशा पध्दतीच्या अर्धवट प्रकल्पांविषयीची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांमध्ये पर्यटनविषयक ठोस असे धोरण न राबवता त्या त्यावेळी लोकप्रतिनिधींना वाटेल तसे प्रकल्प आखले गेले, निधी लावला गेला आणि नंतर तिकडे पर्यटकांची किती वर्दळ वाढली याचा कोणी हिशोब लावला नाही. पर्यटनस्थळांच्या यादीत नाव घालायचे, त्यासाठी वर्षाला इतके भाविक, पर्यटक भेट देतात म्हणून पोलीस खात्याकडून दाखला घ्यायला आणि मग कधी थेट वरून, तर कधी नियोजनामधून निधी लावायचा असे प्रकार घडत गेले; परंतू खरोखरच कोल्हापूर जिल्ह्यात येणारा पर्यटक दोन दिवस कोल्हापुरातच रहावा यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करून प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

१० डिसेंबरपर्यंत माहिती संकलन

जिल्ह्यात अनेक तालुक्यांची क्रीडा संकुले अर्धवट पडून आहेत. सात जिल्ह्यांतील महिला बचत गट तालुका विक्री केंद्र कोट्यवधी रुपये खर्चूनही बंद अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी बहुद्देशीय सभागृहे बांधण्यात आली; परंतु देखभालीअभावी त्यांची वाट लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ताराराणी सभागृहाशेजारी अजूनही एक कोनशिला आहे. हर्षवर्धन पाटील मंत्री असताना या ठिकाणी अभ्यासिका, ग्रंथालय बांधण्यात येणार होते. ते काही अजून उभारले गेले नाही. अशाच पध्दतीच अनेक प्रकल्प, इमारती अर्धवट आहेत. याची माहिती आता १० डिसेंबरपर्यंत संकलित करण्यात येणार आहे.

पन्हाळ्यावरून निघाला विषय

किल्ले पन्हाळ्यावर पर्यटकांना माहिती देण्यासाठी एक केंद्र उभारण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने काेट्यवधी रुपयांचा निधी दिला. छगन भुजबळ तेव्हा पर्यटनमंत्री होते. मात्र नगर परिषदेची परवानगी न घेताच ते काम पूर्ण करण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरले आणि मग नगर परिषदेकडे ना हरकत दाखला मागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते गेले. तेव्हा नगर परिषदेने नकार दिला. गेली अनेक वर्षे ही सुंदर वास्तू धूळ खात पडून आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन