शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

शिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनी, काही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:06 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनीकाही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्ह्यातील २३४ केंद्रांवर पार पडल्या. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवीसाठी १४२ केंद्र तर आठवीसाठी ९२ केंद्रांवर परीक्षा झाली. एकूण ३६ हजार ३४२ जणांनी ही परीक्षा दिली.

शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. अनेक पालक विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी वर्षभर तयारी करून घेत असतात. हीच परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य घडवत असते. तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीच्या रूपातून आर्थिक मदत मिळत असते. त्यामुळे मिळालेल्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडत असते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रश्नपत्रिका काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून अशा अक्षम्य चुका होत असतील, तर या परीक्षा परिषदेवर विश्वास राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.

राज्यातील परीक्षा सुरळीत पार पडली, कुठेही प्रश्नपत्रिका कमी पडल्या अथवा उशिरा पोहोच झाल्या नाहीत. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांबाबत पालकांचा काही आक्षेप असला तरी परिषदेमार्फत ‘आन्सर की’ प्रसिद्ध करणार आहे. काही त्रुटी असतील त्यासंदर्भात कमिटी स्थापन केली असून, याबाबत कमिटी निर्णय घेईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.स्मिता गौंड,सहाय्यक आयुक्त, परिषद पुणे

४२४ जण गैरहजरजिल्ह्यात पाचवीसाठी २३,४५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,२१५ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. २४० परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. आठवीसाठी १३,३११ जणांनी परीक्षा अर्ज भरला होता. त्यापैकी १३,१२७ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. १८४ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली. पेपर १- सकाळी ११ ते १२.३० व पेपर २ - दुपारी १.३० ते ३ यावेळेत पार पडले. 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूरexamपरीक्षा