शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनी, काही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:06 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनीकाही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्ह्यातील २३४ केंद्रांवर पार पडल्या. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवीसाठी १४२ केंद्र तर आठवीसाठी ९२ केंद्रांवर परीक्षा झाली. एकूण ३६ हजार ३४२ जणांनी ही परीक्षा दिली.

शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. अनेक पालक विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी वर्षभर तयारी करून घेत असतात. हीच परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य घडवत असते. तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीच्या रूपातून आर्थिक मदत मिळत असते. त्यामुळे मिळालेल्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडत असते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रश्नपत्रिका काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून अशा अक्षम्य चुका होत असतील, तर या परीक्षा परिषदेवर विश्वास राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.

राज्यातील परीक्षा सुरळीत पार पडली, कुठेही प्रश्नपत्रिका कमी पडल्या अथवा उशिरा पोहोच झाल्या नाहीत. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांबाबत पालकांचा काही आक्षेप असला तरी परिषदेमार्फत ‘आन्सर की’ प्रसिद्ध करणार आहे. काही त्रुटी असतील त्यासंदर्भात कमिटी स्थापन केली असून, याबाबत कमिटी निर्णय घेईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.स्मिता गौंड,सहाय्यक आयुक्त, परिषद पुणे

४२४ जण गैरहजरजिल्ह्यात पाचवीसाठी २३,४५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,२१५ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. २४० परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. आठवीसाठी १३,३११ जणांनी परीक्षा अर्ज भरला होता. त्यापैकी १३,१२७ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. १८४ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली. पेपर १- सकाळी ११ ते १२.३० व पेपर २ - दुपारी १.३० ते ३ यावेळेत पार पडले. 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूरexamपरीक्षा