शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शिवरायांच्या आदर्शांवरच सयाजी महाराजांची वाटचाल: बाबा भांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:50 IST

सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना गुंगारा दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवरायांच्या आदर्शांवरच सयाजी महाराजांची वाटचाल: बाबा भांड कोल्हापुरात मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला

कोल्हापूर : सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना गुंगारा दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी येथे केले.शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्याकोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ‘सयाजी महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक बंडोपंत सावंत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. संदीप पाटील, बंडा महाराज यादव, सुहास निंबाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.बाबा भांड म्हणाले, छत्रपती शिवरायांचे सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन जाणे व जनकल्याणाचे काम करणे हे गुण अंगीकारत सयाजी महाराजांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. शिवरायांचे गुण अंगी बाणले गेल्याने सयाजी महाराजांनी अनेक वर्षे इंग्रजांच्या गुप्तहेर खात्यालाही गुंगारा दिला.ते पुढे म्हणाले, कळवणा (जि. नाशिक) येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा नंतर सयाजी महाराज यांच्या रूपाने बडोद्याचा राजा बनला. ते दूरदृष्टी असलेले राजे होते. जनकल्याणामध्येच आपला मोक्ष आहे, या विचारातून त्यांनी कार्य सुरू ठेवले. अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी आपल्या संस्थानात त्यांनी हुकूम काढला. तो जगातील पहिला हुकूम होता. संस्थानात शाळा स्थापन केल्या, वसतिगृहे बांधली, विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल देत महात्मा फुले यांच्या विचाराने काम केले. भारतातील पहिली भाषांतर शाखा त्यांनी बडोद्यात सुरू केली. शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत भरीव काम केल्याने ब्रिटिशांनाही त्यांचा हेवा वाटू लागला.राजू परांडेकर यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, अवधूत पाटील, भगवान काटे, गुलाबराव घोरपडे, आदी उपस्थित होते.भाऊबंदकीने मराठा साम्राज्य गुंडाळलेजगाचा इतिहास पाहिल्यास अनेक राज्यकर्त्यांनी ५०० ते ६०० वर्षे सत्ता गाजविल्याचे दिसत आहे. तसेच कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्या जवळपास ४०० वर्षे चालल्या; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठा साम्राज्य हे १७५ वर्षांतच गुंडाळले. त्याला कारण म्हणजे मराठा समाजातील भाऊबंदकी होय. भाऊबंदकी म्हणजे मराठ्यांचे आवडते क्षेत्र आहे. प्रसंगी विरोधकांना मदत झाली तरी चालेल या वृत्तीनेच १७५ वर्षांतच मराठा साम्राज्य गुंडाळले. हे आताच्या मराठ्यांनी लक्षात घ्यावे, असे बाबा भांड यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघkolhapurकोल्हापूर