शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सतेज पाटील, जयंत पाटीलांचे कारस्थान उलथवून लावू - राजू शेट्टी 

By राजाराम लोंढे | Updated: April 15, 2024 16:33 IST

शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन  उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता, पण इस्लामपूर व कसबा बावड्यातून चावी फिरली आणि उमेदवार दिला. सतेज पाटील यांच्या मायावी बोलणे व जयंत पाटील यांचे कट कारस्थान उलथवून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन  उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक झाले आहेत, माझा पराभव झाला तर घरातून बाहेर पडणार नाही. शेतकऱ्यांचे देय १८० कोटी द्यावे लागणार नाही, अशी भूमिका कारखानदारांची आहे. पण, कारखानदार पाताळात गेले तर त्यांनी शोधून काढू, एकालाही सोडणार नाही.

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेतकरी नेत्याला मोडण्यासाठी आघाडी व महायुतीतील शकुनीच्या फौजांनी ताकद लावली आहे. सत्यजीत पाटील दहा वर्षे आमदार होता, ऊस दरावर का नाही बोलला ? जातीचा प्रचार करुन मतविभागणी करण्याचा सुरु असलेला उद्योग हाणून पाडा. सावकार मादनाईक, वैभव कांबळे, सतीश काकडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांनी मनोगत व्यक्त केले.

झुंडीविरोधातील लढाई

खोक्याचा बाजार करणारे झुंडी  माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत माझ्यासोबत असल्याने गद्दारांना चितपट करु असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला, ईडीला हिंगलत नाही, मला नोटीस पाठवाच

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीसांकरवी रोखले, दोनशे कार्यकर्त्यांना पोलीसात हजर राहण्याच्या नोटीसा पाठवल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव बंद करावा, कोंबडं झाकून ठेवले म्हणून उगवायचे थांबत नाही. ईडीला घाबरुन भाजपसोबत येणारा आपण नाही. आपण ईडीला हिंगलत नाही. मला नोटीस पाठवाच, ईडीच्या कार्यालयावरच मोर्चा काढू.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४