शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

मनरेगातून गावांच्या समृद्धीसाठी सरपंचांनी पुढे यावे : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:55 IST

Satej Gyanadeo Patil, collceator, kolhapurnews मी समृद्ध तर गाव समृद्ध या विचाराने मनरेगा योजना गावपातळीवर राबविण्यात लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देमनरेगातून गावांच्या समृद्धीसाठी सरपंचांनी पुढे यावे : सतेज पाटीलपालकमंत्री पाटील यांनी व्हीसीद्वारे साधला संवाद

कोल्हापूर : मी समृद्ध तर गाव समृद्ध या विचाराने मनरेगा योजना गावपातळीवर राबविण्यात लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेसंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभा झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपायुक्त नयना बोंदार्डे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, कृषी विभागाच्या उपसंचालक भाग्यश्री पवार हे सहभागी झाले.

रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, राज्य महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले.स्वच्छता अभियानासारखे मनरेगातही काम करासरपंचांना मार्गदर्शन करताना आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, ग्रामपंचायती या विकासाची मंदिरे आहेत. सरपंच, ग्रामसेवक हे त्याचे पुजारी आहेत. मनरेगासारख्या योजनेत गावांचा कायापालट करण्याची ताकद आहे. कोल्हापूर हा तर राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचाराने जिल्हा कायमच नवनवीन संकल्पनांसह अग्रेसर राहिला आहे. ग्रामस्वच्छता अभियानात त्याने हे दाखवून दिले आहे. आता मनरेगामध्येही त्याच उंचीचे काम करायचे आहे.जमीन सुधारणा कार्यक्रम घ्यावनसंवर्धन, मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन कामावर भर द्या, असे सांगताना पोपटराव पवार यांनी कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत समृद्ध पण अमर्याद वापराने जमिनी खराब होऊ लागल्या आहेत. मनरेगातून जमिनीचा आरोग्य सुधारणा कार्यक्रम घ्यावा, असे सुचविले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी