शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

संकेश्वरी मिरचीच्या दरवाढीने लागला ठसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 04:31 IST

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे यंदा ग्राहकांना मिरचीच्या दरवाढीचा ठसका लागला आहे.

कोल्हापूर : अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे यंदा ग्राहकांना मिरचीच्या दरवाढीचा ठसका लागला आहे. चटणी बनविण्याच्या कालावधीतच बॅडगी, लवंगी, कश्मिरी या सगळ्या प्रकारच्या मिरच्यांना मागे टाकत संकेश्वरी मिरचीने किलोला पंधराशे रुपयांचा दर गाठला आहे. ही मिरची गतवर्षी सहाशे रुपयांपर्यंत मिळत होती. याशिवाय अन्य मिरचीच्या दरातही शंभर ते १३० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, चटणी बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात घरोघरी चटणी बनविण्याची लगबग असते. अतिवृष्टीमुळे मिरची कुजल्याने बाजारपेठेत आवक कमी झाली आहे, त्यामुळे दरात किमान शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. अगदी साध्या लवंगी मिरचीपासून ते संकेश्वरीपर्यंतच्या विविध मिरच्यांनी किलोमागे २३० ते १५०० रुपयांपर्यंतची मजल मारली आहे. अन्य मिरचीच्या तुलनेत चव वेगळी असल्याने संकेश्वरी मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. ही मिरची हैदराबादमधून, तर बॅडगी मिरची कर्नाटकातून येते.>कोल्हापुरात कर्नाटक आणि आंध्र, हैदराबादमधून मिरची येते. यंदा पाऊस आणि पुरामुळे मिरचीची आवक कमी झाली आहे. परिणामी दर खूप वाढले आहेत; पण मिरची गरजेचीच असल्याने सर्वसामान्य ग्राहक जरा कमी दर असलेल्या साध्या मिरचीची मागणी करत आहे.- सूरज हळदे ,मिरची व्यावसायिक, कोल्हापूरवर्षभराची चटणी बनविण्यासाठी ५ किलो मिरची खरेदी करते. यावर्षी दर डबल झाले आहेत; पण मिरची खरेदीला पर्याय नसतो. वर्षभर वापरायची असते. त्यामुळे हलक्या प्रतीच्या मिरचीचीही खरेदी करता येत नाही.- हेमा जाधव, गृहिणी, कोल्हापूर