शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

संकेश्वरी मिरचीच्या दरवाढीने लागला ठसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 04:31 IST

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे यंदा ग्राहकांना मिरचीच्या दरवाढीचा ठसका लागला आहे.

कोल्हापूर : अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे यंदा ग्राहकांना मिरचीच्या दरवाढीचा ठसका लागला आहे. चटणी बनविण्याच्या कालावधीतच बॅडगी, लवंगी, कश्मिरी या सगळ्या प्रकारच्या मिरच्यांना मागे टाकत संकेश्वरी मिरचीने किलोला पंधराशे रुपयांचा दर गाठला आहे. ही मिरची गतवर्षी सहाशे रुपयांपर्यंत मिळत होती. याशिवाय अन्य मिरचीच्या दरातही शंभर ते १३० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, चटणी बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात घरोघरी चटणी बनविण्याची लगबग असते. अतिवृष्टीमुळे मिरची कुजल्याने बाजारपेठेत आवक कमी झाली आहे, त्यामुळे दरात किमान शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. अगदी साध्या लवंगी मिरचीपासून ते संकेश्वरीपर्यंतच्या विविध मिरच्यांनी किलोमागे २३० ते १५०० रुपयांपर्यंतची मजल मारली आहे. अन्य मिरचीच्या तुलनेत चव वेगळी असल्याने संकेश्वरी मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. ही मिरची हैदराबादमधून, तर बॅडगी मिरची कर्नाटकातून येते.>कोल्हापुरात कर्नाटक आणि आंध्र, हैदराबादमधून मिरची येते. यंदा पाऊस आणि पुरामुळे मिरचीची आवक कमी झाली आहे. परिणामी दर खूप वाढले आहेत; पण मिरची गरजेचीच असल्याने सर्वसामान्य ग्राहक जरा कमी दर असलेल्या साध्या मिरचीची मागणी करत आहे.- सूरज हळदे ,मिरची व्यावसायिक, कोल्हापूरवर्षभराची चटणी बनविण्यासाठी ५ किलो मिरची खरेदी करते. यावर्षी दर डबल झाले आहेत; पण मिरची खरेदीला पर्याय नसतो. वर्षभर वापरायची असते. त्यामुळे हलक्या प्रतीच्या मिरचीचीही खरेदी करता येत नाही.- हेमा जाधव, गृहिणी, कोल्हापूर