शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नियत साफ नसल्यानेच संजयबाबांचा पत्ता कट

By admin | Updated: April 10, 2015 00:56 IST

हसन मुश्रीफ यांचा टोला : उमेदवारी डावलण्यामागे लोकसभेचे राजकारण

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत संजय घाटगे यांना सत्तारूढ गटाकडून उमेदवारी नाकारल्यावर त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी माझ्याविरोधी घोषणा दिल्याचे वाचून मला त्यांची सहानुभूती वाटली. राग आला नाही. कारण महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश देताना जसे कर्म असते त्याप्रमाणे फळ मिळते व नियत साफ असेल तर भाग्य उदयाला येते, असे सांगितले आहे. या प्रकरणामध्ये तंतोतंत त्याप्रमाणे घडले असून संजय घाटगे यांची नियत चांगली नसल्यानेच त्यांचा सत्तारूढ आघाडीतून पत्ता कट झाल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. गुरुवारी त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.निवेदनात म्हटले आहे, ‘मी संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना आठवण करून देतो की, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून व्हन्नाळीतील ‘समृद्धी’च्या माळावर माझे कौतुक करून विधानसभेमध्ये पाठिंबा देण्याचे वचन घाटगे यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो. अंबरिश यास सभापतिपद दिले. गोकुळ दूध संघामध्ये एक स्त्री उमेदवार कमी देऊन सर्व मते अरुंधती वहिनींना दिली व त्या सर्वांत जास्त मतांनी निवडून आल्या. संघामध्ये हे पद त्यांच्याकडेच राहावे म्हणून दूध संस्था काढून देण्यासाठी मंत्रिपद पणाला लावले. त्यांची इतकी गडबड होती की, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कशा संस्था होतील यासाठी रात्रीचा दिवस ते करत होते. त्यांची नियत साफ नव्हती. विधानसभेला विश्वासघात करायचा, हे त्यांनी पक्के ठरवले होते. संस्था करून घेतल्या व त्यानंतर सूर्याजी पिसाळांचा इतिहास माहीत आहेच. ज्यावेळी दिवंगत नेते मंडलिक मंत्री होते त्यावेळी विक्रमसिंह घाटगे यांच्याशी मतभेदानंतर उपसभापतिपद व इतर सर्व पदे संजय घाटगे यांनी मिळविली व विधानसभेचे मंडलिक यांना वचन दिल. परंतू लगेच १९९५ च्या विधानसभेमध्ये ते मंडलिक यांच्या विरोधात गेले. त्यांची गोकुळमधील उमेदवार डावलण्यामागे लोकसभा निवडणुकीचा संदर्भही आहे. संजय घाटगे यांनी काँग्रेसची सर्व फळे चाखली. परंतु विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मंडलिक यांचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार केला. मंडलिक यांनी आपला ‘शब्द’ पाळला व विधानसभेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. आज मंडलिकसाहेब हयात नाहीत. प्रा. संजयदादांच्या मागे मी उभे राहणार, अशी घोषणा त्यांनी केली. मग प्रा. संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. मग तुमचा सत्तारूढ गटाकडे जाण्याचा हट्ट का? माझा त्यांच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे की ‘शब्द’ देऊन ज्या ज्यावेळी त्यांनी भूमिका बदलली त्यावेळी अशा घोषणा का दिल्या नाहीत? त्यांची उमेदवारी टिकविण्याची जबाबदारी त्यांची होती, ती माझी नाही. व्हनाळीची अंबाबाई जागृतमुश्रीफ म्हणतात, ‘मी संजय घाटगे यांच्याकडून फसवला गेलेला विरोधक आहे. व्हन्नाळीची अंबाबाई जागृत आहे. ती सर्व पाहते आहे. नियत साफ नसणाऱ्या व्यक्तीवर परमेश्वर कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे भाग्य उदयास येऊ शकत नाही. यदाकदाचित काही झालेच तर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीला परमेश्वर पावेल. सूर्याजी पिसाळांसारख्या ‘कर्तृत्ववान’ माणसाला पावणार नाही.