शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच कर्नाटकात जाण्याची सुळकूडवर वेळ : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:39 IST

पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या

ठळक मुद्देधनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांचे अपयश

कोल्हापूर : पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गावावर ही वेळ आल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला; तर राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन सर्व योजना येथे राबवाव्यात, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.

संजय पवार म्हणाले, या गावाने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून, येथील खासदार व आमदारांचे हे अपयश आहे. विकासकामांचे फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या या लोकांनी नेमका कोणता विकास केला हा प्रश्न उपस्थित होत आहे. आदर्श ग्राम योजनेतील गावे निवडताना खासदार व आमदारांनी मते किती आहेत याचाच विचार केला आहे. त्यामुळे कर्तृत्व दाखवायचे असेल तर अशी गावे त्यांनी दत्तक घेऊन आपले कर्तृत्व दाखवावे.

विजय देवणे म्हणाले, या गावाला पायाभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून त्याने कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत अनेक हुतात्मे झाले आहेत. त्यामुळे हा ठराव रद्द करावा यासाठी शिवसेनेने सरपंच लक्ष्मीकांत पाटील यांना विनंतीपत्र दिले आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, विद्या गिरी, दिनकर जाधव, दीनानाथ चौगुले, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते.सुळकूडप्रश्नी मंगळवारी बैठकगावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी राधानगरी-कागल प्रांताधिकाºयांना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विजय देवणे यांनी दिली.पालकमंत्र्यांनी  सुळकूडला भेट द्यावीपालकमंत्री व सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी माणसाच्या हितासाठी या गावाला भेट द्यावी व राज्य शासनाने हे गाव दत्तक घेऊन येथील विकासकामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी देवणे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण