शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कर्ज वाटप न केल्यास राष्ट्रीयकृत बॅँकांचा बंदोबस्त : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:09 IST

ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागरी बॅँकांचे जाळे विणले असून, बॅँकांनी या योजनेतून मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.

ठळक मुद्देकर्ज वाटप न केल्यास राष्ट्रीयकृत बॅँकांचा बंदोबस्त : संजय पवारआण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना : नागरी बॅँकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागरी बॅँकांचे जाळे विणले असून, बॅँकांनी या योजनेतून मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील नागरी बॅँक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संजय पवार म्हणाले, या पूर्वीच्या महामंडळांच्या कर्ज योजनेच्या अनुभवामुळे बॅँका घाबरत असल्याचे चित्र आहे; पण आता घाबरण्याची गरज नाही. पाच लाखांपर्यंतच्या ८५ टक्के कर्जाला आणि त्यापुढील ७५ टक्के कर्जाला शासन हमी देणार आहे. तरीही राष्ट्रीयकृत बॅँका सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांनी लाभार्थ्यांची कुंचबणा करणे बंद करून कर्जाचे वाटप केले पाहिजे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नागरी बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनविण्यासाठी हातभार लावावा.जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी ४५, तर राष्ट्रीयकृत बॅँकांनी ९५ प्रकरणे अशा १४० प्रकरणांच्या माध्यमातून ९.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. हा आकडा समाधानकारक नसून, महामंडळाने कर्जाची हमी घेतल्याने कागदपत्रांचे फारसे जंजाळ न करता कर्ज उपलब्ध करून द्या.

नागरी बॅँक असोसिएशनचे संचालक दत्तात्रय राऊत यांनी प्रास्ताविक केले. वीरशैव बॅँकेचे संचालक सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजे विक्रमसिंह घाटगे, कागल बॅँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, महामंडळाच्या समन्वयक शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नागरी बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ठेवी अधिक कर्जे वाटप कमीजिल्ह्यातील अनेक बॅँकांमध्ये ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप नसल्याने अनेक बॅँका, पतसंस्थांच्या तरलतेच्या रेशोवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगले कर्जदार शोधा, जाग्यावर जाऊन उद्योगाची खातरजमा करून कर्ज वाटप करण्याची सूचना अरुण काकडे यांनी केली.

प्रत्येक बॅँकेत वेगळा कक्षया कर्ज प्रकरणातून बॅँकांचा तोटा होणार नाही, याची खात्री देत संजय पवार म्हणाले, प्रत्येक नागरी बॅँकेने महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी वेगळे कक्ष करावेत. जेणे करून ग्राहकांना ते सोईचे होईल.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर