शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कर्ज वाटप न केल्यास राष्ट्रीयकृत बॅँकांचा बंदोबस्त : संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:09 IST

ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागरी बॅँकांचे जाळे विणले असून, बॅँकांनी या योजनेतून मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.

ठळक मुद्देकर्ज वाटप न केल्यास राष्ट्रीयकृत बॅँकांचा बंदोबस्त : संजय पवारआण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना : नागरी बॅँकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागरी बॅँकांचे जाळे विणले असून, बॅँकांनी या योजनेतून मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील नागरी बॅँक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संजय पवार म्हणाले, या पूर्वीच्या महामंडळांच्या कर्ज योजनेच्या अनुभवामुळे बॅँका घाबरत असल्याचे चित्र आहे; पण आता घाबरण्याची गरज नाही. पाच लाखांपर्यंतच्या ८५ टक्के कर्जाला आणि त्यापुढील ७५ टक्के कर्जाला शासन हमी देणार आहे. तरीही राष्ट्रीयकृत बॅँका सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांनी लाभार्थ्यांची कुंचबणा करणे बंद करून कर्जाचे वाटप केले पाहिजे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नागरी बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनविण्यासाठी हातभार लावावा.जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी ४५, तर राष्ट्रीयकृत बॅँकांनी ९५ प्रकरणे अशा १४० प्रकरणांच्या माध्यमातून ९.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. हा आकडा समाधानकारक नसून, महामंडळाने कर्जाची हमी घेतल्याने कागदपत्रांचे फारसे जंजाळ न करता कर्ज उपलब्ध करून द्या.

नागरी बॅँक असोसिएशनचे संचालक दत्तात्रय राऊत यांनी प्रास्ताविक केले. वीरशैव बॅँकेचे संचालक सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजे विक्रमसिंह घाटगे, कागल बॅँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, महामंडळाच्या समन्वयक शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नागरी बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ठेवी अधिक कर्जे वाटप कमीजिल्ह्यातील अनेक बॅँकांमध्ये ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप नसल्याने अनेक बॅँका, पतसंस्थांच्या तरलतेच्या रेशोवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगले कर्जदार शोधा, जाग्यावर जाऊन उद्योगाची खातरजमा करून कर्ज वाटप करण्याची सूचना अरुण काकडे यांनी केली.

प्रत्येक बॅँकेत वेगळा कक्षया कर्ज प्रकरणातून बॅँकांचा तोटा होणार नाही, याची खात्री देत संजय पवार म्हणाले, प्रत्येक नागरी बॅँकेने महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी वेगळे कक्ष करावेत. जेणे करून ग्राहकांना ते सोईचे होईल.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर