शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापुरात डेपोद्वारेच होणार वाळू पुरवठा, बेकायदेशीर वाहतुकीला बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:11 IST

जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही वाहत असल्याने गेली ६ वर्षे जिल्ह्यात वाळू उपसा बंद

इंदुमती गणेशकोल्हापूर : जिल्ह्यात बारमाही नद्या वाहत असल्याने येथे वाळू उपसा होत नसल्याने शासनाला कोल्हापूरला अन्य जिल्ह्यातूनच डेपोद्वारे वाळू पुरवठा करावा लागणार आहे. स्वस्त दरात वाळू पुरवठा होणार असला तरी त्यासाठी यंत्रणा उभारणे, डेपो तयार करणे यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात होत असलेली अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.हरित लवादाने २०१७ साली ज्या नदीचे पात्र कोरडे असते त्याच नदीतून वाळू उपसा करण्यास परवानगी दिली आहे; पण जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही वाहत असल्याने गेली ६ वर्षे जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. तरीही नदीकाठच्या काही गावांमध्ये अंधारात बेकायदेशीररित्या वाळू उपसा होतो, वाहतूक होते. हे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.त्यामुळे शासनाने ६०० रुपये ब्रास याप्रमाणे वाळू विक्रीचा घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्याच्या अर्थकारणावर फारसा परिणाम होणार नाही, कारण जिल्ह्यात वाळू पट्ट्याचा लिलाव होत नाही. पण अवैधरित्या वाळूची वाहतूक व चढ्या दराने विक्री होते, हा प्रकार थांबेल, असे सरकारी यंत्रणेला वाटते. प्रत्येक तालुक्याला एक डेपो याप्रमाणे जिल्ह्याला वाळू पुरवठा होईल.

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ९ जणांवर कारवाईजिल्हा खनिकर्म विभागाने गेल्या वर्षभरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ९ जणांवर कारवाई केली आहे. यातून विभागाला २४ लाख रुपये दंडापोटी मिळाले आहेत.सिलिका, क्रश सॅन्डचे उतरणार दरकोल्हापुरात बांधकामांसाठी कोकणातील सिलिका सॅन्ड व क्रश सॅन्ड वापरला जातो. आता स्वस्तात वाळू मिळणार असल्याने कृत्रिम वाळूचेही दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे. शासन निर्णयाचे दोन परिणाम होतील, एक तर वाळूचा वापर वाढेल किंवा अन्य जिल्ह्यातून वाळू आणणे, वाहतुकीचा खर्च करण्यापेक्षा कृत्रिम वाळूलाच प्राधान्य दिले जाईल, ज्याचा दर कमी असेल.

अशी असेल प्रक्रियावाळू उपसा, वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. शासनाच्या डेपोतून वाळूची विक्री होईल. प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वाळू संनियत्रण समिती स्थापन होणार आहे. ही समिती वाळू गट निश्चित करून ऑनलाइन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीला शिफारस करेल.

कोल्हापुरात वाळू उपसा होत नसल्याने कृत्रिम वाळूचा वापर अधिक आहे. स्वस्त दरात वाळू विक्रीच्या निर्णयामुळे ग्राहकाला माफक दरात वाळू मिळणार आहे. अवैध वाहतूक थांबणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे अध्यादेशानंतरच स्पष्ट होईल. - आनंद पाटील, कोल्हापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर