शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

तेरवाड बंधारा दूषित पाणीप्रश्नी घेतले नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 23:53 IST

‘लोकमत’कडून वृत्त : प्रदूषण मंडळाला अखेर जाग

कुरुंदवाड : पंचगंगा नदीतील दूषित पाण्यामुळे तेरवाड बंधाऱ्यात मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुले यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन दूषित पाणी व मृत माश्यांचे नमुने घेतले. दरम्यान, पंचगंगेच्या दूषित पाण्याबाबत नेहमी जागरूक व आक्रमक असणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे हे अधिकारी येण्याची वाट पाहत होते. मात्र, सर्वांना चकवा देत अधिकारी येऊन गेल्याने नागरिकांतून आश्चर्य व संतापही व्यक्त होत आहे. पंचगंगेच्या दूषित पाण्याचा प्रश्न शिरोळ तालुक्याला नेहमी सतावत आहे. १५ दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांनी आक्रमक होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे दूषित पाण्यात सुधारणा होईल, अशी आशा असतानाच पुन्हा नदीला काळेकुट्ट पाणी आल्याने व मासे मरत असल्याने ‘लोकमत’ने ‘तेरवाड बंधाऱ्यात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण मंडळ पुन्हा खडबडून जागे झाले. पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचा रोष ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विभागाचे क्षेत्र अधिकारी केंदुळे यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली व दूषित पाणी आणि मृत माश्यांचे नमुने घेतले. दूषित पाण्याच्या वारंवार तक्रारीबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी अधिकारी येण्याची वाट पाहत सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्यासह नागरिक बसले होते. मात्र, अधिकारी कधी आले याचा सुगावाच नागरिकांना न लागल्याने व अधिकारी केंदुले यांना बालिघाटे यांनी संपर्क साधल्यावर येऊन गेल्याचे समजताच सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चकवा दिल्याने संताप व्यक्त होत आहे. जबाबदार घटकांवर कारवाई करणार पंचगंगा नदीवरील तेरवाड हा बंधारा शेवटचा असल्याने व पाण्याचा प्रवाह थांबल्याने दूषित पाण्याची समस्या उन्हाळ्यामध्ये निर्माण होते. मृत मासे व पाण्याचे नमुने घेतले असून, त्याची तपासणी करण्यासाठी चिपळूणला पाठविले आहे. पाणी दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चालू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुले यांनी सांगितले.