शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

संभाजीराजेंचे चरित्र आता रंगमंचावर

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

कोल्हापूरच्या इतिहासप्रेमींचा उपक्रम : ‘राजा संभाजी’ नाटकासाठी रविवारी आॅडिशन

कोल्हापूर : राजा शंभू छत्रपती म्हणजे मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील एक धगधगते पर्व. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवताना त्यांनी मृत्यूचाही बेदरकारपणे सामना केला. या वीर योद्ध्याचे प्रेरणादायी जीवनचरित्र आता रंगभूमीवर येत आहे. कोल्हापुरातील इतिहासप्रेमींच्यावतीने ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यांत हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवगर्जना’ तसेच ‘गाथा छत्रपतींची’ या महानाट्यांनंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून संभाजीराजेंचे चरित्र नाट्यरूपात येत आहे. या नाटकाच्या स्क्रीप्टचे संपादन ज्ञानेश महाराव यांनी केले असून दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण करणार आहेत. कोल्हापूरच्या दर्जेदार नाटकांच्या परंपरेचेच पाईक म्हणून ‘राजा संभाजी’ हे नाटक निर्माण केले जाणार आहे. यासाठी ५० हून अधिक कलाकारांची आवश्यकता आहे. रविवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून शाहू स्मारक भवनात आॅडिशन्स होणार आहेत. इच्छुकांनी बायोडाटा व प्रात्यक्षिकांच्या तयारीसह उपस्थित राहावे. (प्रतिनिधी) आधीच्या नाटकात मृत्यू केंद्रस्थानीछत्रपती संभाजीराजेंचे चरित्र सांगणारी अनेक नाटके यापूर्वी रंगभूमीवर आली आहेत. त्यांची संख्या शिवाजी महाराजांवरील नाटकांपेक्षाही अधिक आहे. राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे पहिले नाटक संभाजीराजेंवर लिहिले. त्यानंतर ‘बेबंदशाही’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘शंभूराजे’ अशी अनेक नाटके गाजली. मात्र, यातील काही नाटकांत संभाजीराजेंच्या केवळ मृत्यूवरच प्रकाशझोत टाकण्यात आला आहे किंवा मग संभाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरावेत, असे वर्णन आहेत.‘राजा संभाजीं’चे वैशिष्ट्य संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र मांडणारे हे पहिले नाटक असणार आहे. त्यात संभाजीराजेंच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. संभाजीराजे उत्तम साहित्यिक होते, रसिक होते, मुत्सद्दी लढवय्या होते, त्यांचे राजकारण देशभरात फिरत होते. कुशल राजा म्हणून त्यांनी केलेले कार्य अडीच तासांच्या नाटकात मांडले जाईल. संभाजीराजेंवर आजवर निर्माण झालेल्या बहुतांशी नाटकांत त्यांचे चारित्र्यहनन किंवा मृत्यूचेच अधिक वर्णन आहे. ‘राजा संभाजी’मध्ये मात्र त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्याही काही घटनांचा समावेश असणार आहे.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक